शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पाच तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:22 IST

अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला.

ठळक मुद्देनिर्णय : राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर व यवतमाळचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असताना पाचच तालुके यात समाविष्ट झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ एप्रिल रोजी घोषित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित केला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदूआर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकस्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून पाच तालुके मध्यम दुष्काळी घोषित करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. दुष्काळ घोषित झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती केवळ या सहा तालुक्यांनाच मिळणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ६७.४५ टक्के पाऊस झाला. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा जास्त घटले. अपुºया पावसाने सोयाबीन हातीच लागले नाही. अशीच स्थिती इतर पिकांची आहे. बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. तूर खरेदीचे भिजत घोंगडे अद्यापही सुरूच आहे. अशा स्थितीत जिल्हा दुष्काळी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार केवळ पाच तालुक्यांचा मध्यम दुष्काळात समावेश केला. जिल्ह्यातील ११ तालुक्यांना यातून वगळल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तालुक्यातही दुष्काळीस्थिती असताना कोणत्या निकषावर या तालुक्यांना वगळले, असा सवाल आहे.शासन निर्णयात शब्दांचा खेळराज्य शासनाने दुष्काळ घोषित करताना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असा शब्दप्रयोग शासन निर्णयात केला. आजपर्यंत दुष्काळसदृश्य आणि दुष्काळ असेच शब्द वापरले जायचे. परंतु प्रथमच मध्यम दुष्काळाचा शोध शासनाने लावला आहे. मध्यम दुष्काळ आणि दुष्काळ यात नेमके कोणते अंतर आहे, हे मात्र निणर्यात अधोरेखित केले नाही.