शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केवळ पाच तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:22 IST

अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला.

ठळक मुद्देनिर्णय : राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर व यवतमाळचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असताना पाचच तालुके यात समाविष्ट झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ एप्रिल रोजी घोषित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित केला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदूआर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकस्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून पाच तालुके मध्यम दुष्काळी घोषित करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. दुष्काळ घोषित झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती केवळ या सहा तालुक्यांनाच मिळणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ६७.४५ टक्के पाऊस झाला. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा जास्त घटले. अपुºया पावसाने सोयाबीन हातीच लागले नाही. अशीच स्थिती इतर पिकांची आहे. बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. तूर खरेदीचे भिजत घोंगडे अद्यापही सुरूच आहे. अशा स्थितीत जिल्हा दुष्काळी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार केवळ पाच तालुक्यांचा मध्यम दुष्काळात समावेश केला. जिल्ह्यातील ११ तालुक्यांना यातून वगळल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तालुक्यातही दुष्काळीस्थिती असताना कोणत्या निकषावर या तालुक्यांना वगळले, असा सवाल आहे.शासन निर्णयात शब्दांचा खेळराज्य शासनाने दुष्काळ घोषित करताना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असा शब्दप्रयोग शासन निर्णयात केला. आजपर्यंत दुष्काळसदृश्य आणि दुष्काळ असेच शब्द वापरले जायचे. परंतु प्रथमच मध्यम दुष्काळाचा शोध शासनाने लावला आहे. मध्यम दुष्काळ आणि दुष्काळ यात नेमके कोणते अंतर आहे, हे मात्र निणर्यात अधोरेखित केले नाही.