शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

केवळ पाच तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:22 IST

अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला.

ठळक मुद्देनिर्णय : राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर व यवतमाळचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असताना पाचच तालुके यात समाविष्ट झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ एप्रिल रोजी घोषित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित केला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदूआर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकस्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून पाच तालुके मध्यम दुष्काळी घोषित करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. दुष्काळ घोषित झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती केवळ या सहा तालुक्यांनाच मिळणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ६७.४५ टक्के पाऊस झाला. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा जास्त घटले. अपुºया पावसाने सोयाबीन हातीच लागले नाही. अशीच स्थिती इतर पिकांची आहे. बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. तूर खरेदीचे भिजत घोंगडे अद्यापही सुरूच आहे. अशा स्थितीत जिल्हा दुष्काळी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार केवळ पाच तालुक्यांचा मध्यम दुष्काळात समावेश केला. जिल्ह्यातील ११ तालुक्यांना यातून वगळल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तालुक्यातही दुष्काळीस्थिती असताना कोणत्या निकषावर या तालुक्यांना वगळले, असा सवाल आहे.शासन निर्णयात शब्दांचा खेळराज्य शासनाने दुष्काळ घोषित करताना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असा शब्दप्रयोग शासन निर्णयात केला. आजपर्यंत दुष्काळसदृश्य आणि दुष्काळ असेच शब्द वापरले जायचे. परंतु प्रथमच मध्यम दुष्काळाचा शोध शासनाने लावला आहे. मध्यम दुष्काळ आणि दुष्काळ यात नेमके कोणते अंतर आहे, हे मात्र निणर्यात अधोरेखित केले नाही.