शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST

फोटो अविनाश खंदारे उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर ...

फोटो

अविनाश खंदारे

उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर अवसायनात निघाला. त्यामुळे शेकडो ऊस उत्पादक, कामगार, लघू व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव आणि हिमायतनगर या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू म्हणून वसंतची ओळख आहे. २०१५-१६ मध्ये कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस येऊन कारखाना ठप्प झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. संचित तोटा वाढल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले. प्रादेशिक सहसंचालक, अमरावती (साखर) यांनी अखेर कारखाना अवसायनात काढला. वाय.पी. गोतरकर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली.

‘वसंत’ सुरू करण्यासाठी खासदार हेमंत पाटील, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक, आमदार माधवराव पाटील, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे व राजेंद्र नजरधने यांच्यासह ऊस उत्पादक सभासद संघ व कामगार संघटनांनी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठपुरावा केला. परंतु, कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढल्यामुळे कारखाना सुरू झाला नाही.

दरम्यान, प्रशासक सुरेश महंत यानी वेळोवेळी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. दोनदा निविदाही काढल्या. मात्र, उपयोग झाला नाही. अखेरीस कारखाना अवसायनात निघाला. यामुळे कारखान्यावरील व्याज व्याज कमी होणार असल्याचे सांगितले जाते. तथापि, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कर्मचारी, कामगार, शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी कारखान्याकडे बाकी आहेत. या विभागातील लोकप्रतिनिधी आपली भूमिका योग्य बजावू शकले नाहीत, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बॉक्स

‘वसंत’चे वसंत बंद झाल्याने स्वप्न भंगले

१९६७ मध्ये माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी कारखाना स्थापन केला होता. त्यांनी शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, वसंत अवसायनात निघाल्याने आता दिवंगत वसंतराव नाईक यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेला व त्यांच्याच नावाने असलेला कारखाना बंद पडला आहे. यापूर्वी दिवंगत सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानासुद्धा अवसायनात निघाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कोट

वसंत साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज आहे. पुसद, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, महागाव या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक व कामगार यांचे हित लक्षात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न करू.

वाय.पी. गोतरकर, अवसायक

कोट

वसंत कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी कमी पडले. कारखाना अवसायनात काढताना ऊस उत्पादक व कामगारांना विश्वासात घेतले नाही. अवसायनाची माहिती देण्यासाठी कारखाना साइटवरील नोटीस बोर्डावर प्रशासकांनी नोटीस लावली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगार यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार आहोत.

- व्ही.एम. पंतगराव, अध्यक्ष, कामगार संघटना