शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST

फोटो अविनाश खंदारे उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर ...

फोटो

अविनाश खंदारे

उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर अवसायनात निघाला. त्यामुळे शेकडो ऊस उत्पादक, कामगार, लघू व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव आणि हिमायतनगर या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू म्हणून वसंतची ओळख आहे. २०१५-१६ मध्ये कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस येऊन कारखाना ठप्प झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. संचित तोटा वाढल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले. प्रादेशिक सहसंचालक, अमरावती (साखर) यांनी अखेर कारखाना अवसायनात काढला. वाय.पी. गोतरकर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली.

‘वसंत’ सुरू करण्यासाठी खासदार हेमंत पाटील, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक, आमदार माधवराव पाटील, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे व राजेंद्र नजरधने यांच्यासह ऊस उत्पादक सभासद संघ व कामगार संघटनांनी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठपुरावा केला. परंतु, कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढल्यामुळे कारखाना सुरू झाला नाही.

दरम्यान, प्रशासक सुरेश महंत यानी वेळोवेळी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. दोनदा निविदाही काढल्या. मात्र, उपयोग झाला नाही. अखेरीस कारखाना अवसायनात निघाला. यामुळे कारखान्यावरील व्याज व्याज कमी होणार असल्याचे सांगितले जाते. तथापि, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कर्मचारी, कामगार, शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी कारखान्याकडे बाकी आहेत. या विभागातील लोकप्रतिनिधी आपली भूमिका योग्य बजावू शकले नाहीत, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बॉक्स

‘वसंत’चे वसंत बंद झाल्याने स्वप्न भंगले

१९६७ मध्ये माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी कारखाना स्थापन केला होता. त्यांनी शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, वसंत अवसायनात निघाल्याने आता दिवंगत वसंतराव नाईक यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेला व त्यांच्याच नावाने असलेला कारखाना बंद पडला आहे. यापूर्वी दिवंगत सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानासुद्धा अवसायनात निघाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कोट

वसंत साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज आहे. पुसद, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, महागाव या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक व कामगार यांचे हित लक्षात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न करू.

वाय.पी. गोतरकर, अवसायक

कोट

वसंत कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी कमी पडले. कारखाना अवसायनात काढताना ऊस उत्पादक व कामगारांना विश्वासात घेतले नाही. अवसायनाची माहिती देण्यासाठी कारखाना साइटवरील नोटीस बोर्डावर प्रशासकांनी नोटीस लावली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगार यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार आहोत.

- व्ही.एम. पंतगराव, अध्यक्ष, कामगार संघटना