शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्जवाटप केवळ ९ टक्के

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अवघ्या नऊ टक्क्यावरच थांबलेले आहेत.

साडेतीन लाख शेतकरी अडचणीत : जिल्हा बँक ४८, तर ग्रामीण ११ टक्के रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अवघ्या नऊ टक्क्यावरच थांबलेले आहेत. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची पेरणी अडचणीत आली असून ती उधारीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातही नऊ टक्के वाटपाचा हा आकडा दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रीयकृत बँकांकडून सुरू आहे. उलट जिल्हा सहकारी व ग्रामीण बँकेचे आकडे एकत्र करून १९ टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न राष्ट्रीयकृत बँकांकडून होत आहे. राष्ट्रीयकृत बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी एक हजार २३४ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बँकांनी पीक कर्ज वाटपाचा भोपळाही फोडला नव्हता. आतापर्यंत या बँकांनी केवळ नऊ टक्के अर्थात १०६ कोटी ९२ लाख रुपयांचेच पीक कर्ज वाटप केल्याची धक्कादायक माहिती सहकार विभागातून पुढे आली आहे. वास्तविक आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप किमान ४० टक्क्याच्या पुढे अपेक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतरही राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाची टक्केवारी वाढली नाही, हे विशेष. दहा हजार रूपयांच्या मदतीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादीच राष्ट्रीयकृत बँकांनी अद्यापपर्यंत जाहीर केली नाही. इतकेच नव्हे तर कर्जमाफीस किती शेतकरी पात्र असतील याची माहितीही अग्रणी बँकेच्या मुख्य कार्यालयाला नाही. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीक कर्ज वाटपाची टक्केवारी समाधानकारक मानली जाते. जिल्हा बँकेला ४६२ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट शासनाने निश्चित करून दिले होते. या पैकी आतापर्यंत २२१ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. ही टक्केवारी ४८ एवढी आहे. ग्रामीण बँकेला १३९ कोटींचे उद्दीष्ट होते. त्यांनी आतापर्यंत ११ टक्के अर्थात १६ कोटी २१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाच्या मंदगतीबाबत नेहमीच शेतकऱ्यांमधून ओरड पहायला मिळते. या बँका राज्य शासनाला आणि जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही जुमानत नसल्याचे अनेकदा पुढे आले आहे. बँकर्स कमिटीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गती वाढविण्याचे आदेश देऊनही राष्ट्रीयकृत बँका अद्याप नऊ टक्क्यातच असल्याने या बँका प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसून येते. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. माफीच्या घोषणेनंतर गती मंदावली शासनाने कर्जमाफीची घोषणा करताच जणू कर्जाच्या परतफेडीची प्रक्रिया थांबली आहे. त्याचा परिणाम सहकारी बँकांच्या कर्ज वाटपावर होऊ लागला आहे. पैसाच उपलब्ध न झाल्याने कर्ज वाटप करावे कसे असा प्रश्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढे निर्माण झाला आहे. माफीच्या या घोषणेमुळे कर्ज वाटपाची प्रक्रिया चांगलीच मंदावली आहे. शेतकऱ्यांच्या येरझारा बँकांकडे किमान १० हजार तरी मिळतील म्हणून शेतकरी येरझारा मारत आहे. जिल्हा बँकेने पैसा नसल्याचे कारण पुढे केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांनी आम्हाला वाटपाचे आदेश नसल्याचे म्हटले आहे. एकूणच सर्वच शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. ३० टक्के शेतकऱ्यांनी उधारीवर पेरणी केली आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना ते ही जमले नाही. यामुळे ही शेती यंदा पडिक राहते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. ३० टक्के शेतकऱ्यांची पेरणी उधारीवर पीक कर्ज वाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आले. मात्र त्यांचीच वाटपाची टक्केवारी अद्याप दोन अंकी आकड्यातही पोहोचलेली नाही. तर जिल्हा बँकेकडे कर्ज वाटपासाठी पुरेसा पैसा नाही. अशा स्थितीत उधारीवर खरीप हंगामाची पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अर्धेअधिक शेतकरी कृषी केंद्रातून बी-बियाणे, खते उधारीवर आणून आपली पेरणी साधण्याची चिन्हे आहेत. बँकर्स कमिटीची मंगळवारी बैठक जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवार २७ जून रोजी बँकर्स कमिटीची बैठक बोलविली आहे. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.