शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

बेंबळात केवळ २९ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 21:55 IST

यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही.

ठळक मुद्देपाण्याचे दुर्भिक्ष्य भेडसावणार : उन्हाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे

आरिफ अली ।लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही. बेंबळा धरण परिसरात यावर्षीच्या पावसाळ्यात ४ आॅक्टोबरपर्यंत केवळ २९३ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत या परिसरात ५२६ मिमी पावसाची नोंद तर २०१५ मध्ये ४४३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.बेंबळा धरणाचा कॅचमेन्ट एरिया असलेल्या कुपटी, कारंजा, नांदगाव खंडेश्वर, चांदुररेल्वे, कोहळा, जटेश्वर, नेर व डॅम साईड यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात सद्यस्थितीत २६६.२६ म्हणजे केवळ २९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यामुळे येणाºया उन्हाळ्यात तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे. शेती आणि गुरांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होणार आहे.नदी-नाले कोरडे पडल्यामुळे आताच गोपालकांना विहिरीतून पाणी काढून आपल्या पशुंची तहान भागवावी लागत आहे. बेंबळा धरणातून पाणी सोडल्यास बेंबळा नदीची धार सुरू होवू शकते. मात्र धरणातच केवळ २९ टक्के जलसाठा असल्यामुळे पाणी सोडण्याची आशाही धूसर झाली आहे. ज्या विहिरींवरून नागरिक पिण्यासाठी पाणी काढत आहेत त्याच ठिकाणी गोपालक आपल्या जनावरांनाही पाणी पिण्यासाठी नेत असल्यामुळे वादावादी होत आहे. अशीच स्थिती कायम राहल्यास मोठी समस्या निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.काळजी वाढलीबेंबळा धरणातील पाण्यावर अनेक गावे अवलंबून आहे. तर भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी यवतमाळ ते बेंबळा पाईपलाईनचे काम सुरू आहे. अशा स्थितीत याच धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे.