शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बेंबळात केवळ २९ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 21:55 IST

यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही.

ठळक मुद्देपाण्याचे दुर्भिक्ष्य भेडसावणार : उन्हाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे

आरिफ अली ।लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही. बेंबळा धरण परिसरात यावर्षीच्या पावसाळ्यात ४ आॅक्टोबरपर्यंत केवळ २९३ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत या परिसरात ५२६ मिमी पावसाची नोंद तर २०१५ मध्ये ४४३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.बेंबळा धरणाचा कॅचमेन्ट एरिया असलेल्या कुपटी, कारंजा, नांदगाव खंडेश्वर, चांदुररेल्वे, कोहळा, जटेश्वर, नेर व डॅम साईड यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात सद्यस्थितीत २६६.२६ म्हणजे केवळ २९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यामुळे येणाºया उन्हाळ्यात तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे. शेती आणि गुरांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होणार आहे.नदी-नाले कोरडे पडल्यामुळे आताच गोपालकांना विहिरीतून पाणी काढून आपल्या पशुंची तहान भागवावी लागत आहे. बेंबळा धरणातून पाणी सोडल्यास बेंबळा नदीची धार सुरू होवू शकते. मात्र धरणातच केवळ २९ टक्के जलसाठा असल्यामुळे पाणी सोडण्याची आशाही धूसर झाली आहे. ज्या विहिरींवरून नागरिक पिण्यासाठी पाणी काढत आहेत त्याच ठिकाणी गोपालक आपल्या जनावरांनाही पाणी पिण्यासाठी नेत असल्यामुळे वादावादी होत आहे. अशीच स्थिती कायम राहल्यास मोठी समस्या निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.काळजी वाढलीबेंबळा धरणातील पाण्यावर अनेक गावे अवलंबून आहे. तर भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी यवतमाळ ते बेंबळा पाईपलाईनचे काम सुरू आहे. अशा स्थितीत याच धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे.