शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पोलीस बंदोबस्तात शिष्यवृतीचे आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:05 IST

राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाची स्पष्टोक्ती : ३१ आॅगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जातील

यवतमाळ : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्रावर शेकडो विद्यार्थ्यांची झुंबड दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. ३१ आॅगस्ट ही शिष्यवृत्तीसाठी आधार अपडेशनची शेवटची तारीख नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आणि गर्दी न करता, नियमानुसार आपले आधार अपडेशन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक जोडणे गरजेचे आहे. आणि यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्र सुरू आहे. या ठिकाणी सकाळी बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म देण्यात येते आणि नंतर तेवढ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारल्या जाते. परंतु ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता गोंधळ पाहता अखेरीस जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता. काही महाविद्यालयांनीसुद्धा कोणतीही शहानिशा न करता महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालया पाठविणे सुरू केले आहे. तर काही विद्यार्थी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थी संख्या पाहता, जिल्ह्यात त्वरित आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली होती.याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्याशी संपर्क साधला असता. ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख नसल्याने स्पष्ट करण्यात आले असून वरिष्ठांकडून आम्हाला तशी तारीख कळविल्यानंतर ती सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.तीनशे ते चारशे विद्यार्थी एकाचवेळी येत आहेत, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. प्रत्येकाला आम्ही टोकण दिले आहे. एकच सेंटर सुरू आहे. जास्तचे सेंटर आत्ताच सुरू करणे शक्य नाही. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी असेल तर प्राचार्यांनी आमच्यासोबत संपर्क साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही, ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे शासनाने कुठेही म्हटलेले नाही.- नरेंद्र फुलझेलेनिवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ