शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

लाॅकडाऊन काळातील एक हजार 588 गुन्हे रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

कुठल्याही गुन्हाचा खटला सरकारतर्फे चालविला जातो. शासनाला गुन्हे मागे घ्यायचे असल्यास त्या संदर्भात सरक्युलर काढावे लागते. त्याचा आदेश पोलीस महासंचालकांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येतो. पोलीस ठाण्यांमधून या आदेशाच्या अनुषंगाने त्यांच्या न्यायालयात अर्ज केला जातो. या अर्जावर न्यायालय आदेश करते. त्या आदेशानंतरच गुन्हे मागे घेतले जातात. या पद्धतीने गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. 

ठळक मुद्देगृहमंत्र्यांची घोषणा : जिल्हा प्रशासनाला मागितला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना महामारीच्या संकटात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अनेक बाबींवर निर्बंध घालण्यात आले होते. कुणी घराबाहेर कधी पडायचे याच्याही वेळा निश्चीत करण्यात आल्या होत्या. बाजारपेठेतील फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांनाच उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. या काळात अनेकांकडून नियम मोडण्यात आले. अशा प्रकारे एक हजार ५८८ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याच्या ४५ गुन्ह्यांचा समावेश आहे. आता यातील कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे गुन्हे वगळता भादंवि कलम १८८ व भादंवि कलम २६९ नुसार दाखल गुन्ह्यांमध्ये मालमत्तेचे नुकसान झाले नसेल, अशा स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. गृहमंत्र्यांनीही आपल्या दौऱ्यामध्ये याबाबत ठिकठिकाणी सूतोवाच केले होते. त्यामुळे या प्रक्रियेकडे लक्ष आहे. 

गुन्हे परत कसे घेतले जातात कुठल्याही गुन्हाचा खटला सरकारतर्फे चालविला जातो. शासनाला गुन्हे मागे घ्यायचे असल्यास त्या संदर्भात सरक्युलर काढावे लागते. त्याचा आदेश पोलीस महासंचालकांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येतो. पोलीस ठाण्यांमधून या आदेशाच्या अनुषंगाने त्यांच्या न्यायालयात अर्ज केला जातो. या अर्जावर न्यायालय आदेश करते. त्या आदेशानंतरच गुन्हे मागे घेतले जातात. या पद्धतीने गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  

विना परवानगी घराबाहेर पडणाऱ्यांवर सर्वाधिक गुन्हेलाॅकडाऊन काळात विना परवानगी घराबाहेर पडणाऱ्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केलेले नियम मोडून बाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले. त्या खालोखाल पोलिसांचा ससेमीरा चुकवित विना परवानगी प्रवास करणाऱ्यांवरही सर्वात जास्त ४१४ गुन्हे दाखल झाले आहेत. आता या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. लाॅकडाऊनमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची वेळ निर्धारित करण्यात आली होती. या निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकान सुरू ठेवणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.  

कोरोना काळातील दाखल गुन्ह्यांबाबत शासन स्तरावर काय निर्णय झाला याची कुठलीही लिखित स्वरूपात माहिती नाही. गुन्हे मागे घेण्याबाबतचा अधिकृत आदेशही अद्याप प्राप्त झालेला नाही. या गुन्ह्यांबाबत अधिकृत आदेश मिळाल्यांतरच पुढील कारवाई करता येईल. त्या आदेशाची प्रत आणखी मिळालेली नाही. त्यामुळे हे गुन्हे मागे घेतले जाईल, यावर सध्याच काही भाष्य करता येणार नाही.  - डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी