शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

एक हजार ३७७ जणांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : नागरिकांनी आता खरा लॉकडाऊन पाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून आजपर्यंत एक हजार ३७७ नागरिक, मजूर, विद्यार्थी आले आहेत. त्यांची प्रथमत: केळापूर येथील जगदंबा मंदिरात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. तेथे आरोग्य विभाग, महसूल व पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे येथून ९८, तर मुंबईतून ५८ नागरिक आले आहेत. आजपर्यंत केळापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही, ही प्रशासनाची जमेची बाजू आहे. मात्र प्रशासनासोबतच नागरिकांची जबाबदारेखील वाढली आहे.आता मात्र स्थलांतरीत नागरिकांना किमान १४ दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तसेच कोणाला कोरोनाविषयक लक्षणे आढळून आले, तर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अन्यथा एखादी छोटीशी चूकदेखिल अनेकांचे जीव धोक्यात टाकू शकते. त्यामुळे नागरिकांना ३१ मेपर्यंत अतिशय जागरूक व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या