शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार ३७७ जणांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : नागरिकांनी आता खरा लॉकडाऊन पाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून आजपर्यंत एक हजार ३७७ नागरिक, मजूर, विद्यार्थी आले आहेत. त्यांची प्रथमत: केळापूर येथील जगदंबा मंदिरात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. तेथे आरोग्य विभाग, महसूल व पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे येथून ९८, तर मुंबईतून ५८ नागरिक आले आहेत. आजपर्यंत केळापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही, ही प्रशासनाची जमेची बाजू आहे. मात्र प्रशासनासोबतच नागरिकांची जबाबदारेखील वाढली आहे.आता मात्र स्थलांतरीत नागरिकांना किमान १४ दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तसेच कोणाला कोरोनाविषयक लक्षणे आढळून आले, तर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अन्यथा एखादी छोटीशी चूकदेखिल अनेकांचे जीव धोक्यात टाकू शकते. त्यामुळे नागरिकांना ३१ मेपर्यंत अतिशय जागरूक व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या