शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

महागावात एक पाऊल वसुंधरेच्या रक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:41 IST

महागाव : येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वसुंधरेच्या रक्षणासाठी पाउल उचलले आहे. या उपक्रमातून धरतीच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा ...

महागाव : येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वसुंधरेच्या रक्षणासाठी पाउल उचलले आहे. या उपक्रमातून धरतीच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला आहे.

सध्या संपूर्ण विश्व महामारीच्या विळख्यात अडकून हतबल झाले आहे. मानव लाॅकडाऊनमुळे अज्ञात भीतीने घरात बसून आहे. दुसरीकडे हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन विना रुग्ण कासावीस होत आहे. अशात माहूर तालुका माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीसह पोलीस मित्र फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गजानन भारती, माजी स्वीकृत नगरसेवक जयंत चौधरी व येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेच्या वृक्षांना डिजिटल रंगरंगोटी करून एक पाऊल वसुंधरेकडे नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.

सध्या वृक्षतोडीने

निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून की काय पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढत आहे. विकासाच्या नावावर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणात लाखो झाडांचा ऱ्हास होत आहे. पर्यायाने मानवी जीवांचे प्राण म्हणून समजल्या जाणारा ऑक्सिजनच सुटीवर गेल्यासारखाच आहे. त्यामुळे कोरोनाच्या माहामारीत औषधाऐवजी माणूस ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जगाचा निरोप घेत आहे. यामुळे व्यथित होऊन रस्त्याकडेच्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे. गजानन भारती व सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला. निवृत्त शिक्षणाधिकारी बाबाराव वानोळे, सुजित ठाकूर आदी या अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहे. महागाव ते फुलसावंगी मार्गावरील वृक्षांच्या बुंध्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. यावेळी शेख मन्नान, नारायण भरवाडे, आदित्य भारती, विनोद कोपरकर, बळीराम भवरे आदी उपस्थित होते.