शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

महागावात एक पाऊल वसुंधरेच्या रक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:41 IST

महागाव : येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वसुंधरेच्या रक्षणासाठी पाउल उचलले आहे. या उपक्रमातून धरतीच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा ...

महागाव : येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वसुंधरेच्या रक्षणासाठी पाउल उचलले आहे. या उपक्रमातून धरतीच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला आहे.

सध्या संपूर्ण विश्व महामारीच्या विळख्यात अडकून हतबल झाले आहे. मानव लाॅकडाऊनमुळे अज्ञात भीतीने घरात बसून आहे. दुसरीकडे हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन विना रुग्ण कासावीस होत आहे. अशात माहूर तालुका माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीसह पोलीस मित्र फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गजानन भारती, माजी स्वीकृत नगरसेवक जयंत चौधरी व येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेच्या वृक्षांना डिजिटल रंगरंगोटी करून एक पाऊल वसुंधरेकडे नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.

सध्या वृक्षतोडीने

निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून की काय पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढत आहे. विकासाच्या नावावर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणात लाखो झाडांचा ऱ्हास होत आहे. पर्यायाने मानवी जीवांचे प्राण म्हणून समजल्या जाणारा ऑक्सिजनच सुटीवर गेल्यासारखाच आहे. त्यामुळे कोरोनाच्या माहामारीत औषधाऐवजी माणूस ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जगाचा निरोप घेत आहे. यामुळे व्यथित होऊन रस्त्याकडेच्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे. गजानन भारती व सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला. निवृत्त शिक्षणाधिकारी बाबाराव वानोळे, सुजित ठाकूर आदी या अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहे. महागाव ते फुलसावंगी मार्गावरील वृक्षांच्या बुंध्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. यावेळी शेख मन्नान, नारायण भरवाडे, आदित्य भारती, विनोद कोपरकर, बळीराम भवरे आदी उपस्थित होते.