शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

बंडखोरांचे एक पाऊल मागे

By admin | Updated: June 6, 2014 00:11 IST

विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक

आश्रयदाताच गेला : भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते वार्‍यावर यवतमाळ : विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक निष्ठावंतांनी बंडखोरीची तयारीही केली होती. परंतु आश्रयदाताच गेल्याने आता बंडखोरांनीही एक पाऊल मागे घेतले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंडेंची येथे नेते-कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही. मात्र गडकरी गटाच्या ‘कर्मशियल’ राजकारणाने त्रासलेल्या निष्ठावंत व हाडाच्या कार्यकर्त्यांना मुंडेंचाच खरा आधार वाटत होता. पक्षासाठी झटणार्‍या, पक्ष उभा करणार्‍या सामान्य कार्यकर्त्याला महत्वाची पदे, निवडणुकांच्या तिकिटा, लालदिवे देण्यासाठी मुंडेंचा नेहमीच आग्रह होता. नेमकी या उलट स्थिती सध्या विदर्भात आहे. भाजपात कंत्राटदार, बिल्डर, कमिशन एजंट, प्रॉपर्टी ब्रोकर, डेव्हलपर्स, व्यापारी यांचीच चालती असल्याचे कार्यकर्ते बोलतात. त्यांनाच कित्येक वर्षांंपासून निवडणुकांमध्ये तिकिटे दिली जात आहे. तेच ते चेहरे पुढे येत आहे. त्यामुळेच भाजपात नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज वाढली आहे. निष्ठावंतांनी या कर्मशियल राजकारणापायी घरी बसणे पसंत केले. घरी बसलेली ही निष्ठावंत मंडळी केवळ मुंडेंच्या नेतृत्वाकडे पाहूनच अद्याप भाजपात आहे. परंतु आता मुंडे गेल्याने ही कार्यकर्त्यांंची फळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीत यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात भाजपातून बंडखोरी करण्याची तयारी केली गेली. यवतमाळात तर प्रमुख दोन दावेदार त्या तयारीत होते. त्यांनी मतदारसंघात संपर्क अभियानही सुरू केले. परंतु आता आश्रय देणारे गोपीनाथ मुंडेच जगात नसल्याने बंडखोरी कुणाच्या भरोश्यावर करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळेच या संभाव्य बंडखोरांनी एक पाऊल मागे घेत तूर्त  जैसे थे राहण्याची भूमिका घेतली आहे. मुंडेंना नेहमीच ‘मासबेस’ कार्यकर्त्यांंची साथ लाभली आहे. सध्या भाजपात मात्र ‘मासलेस’ कार्यकर्त्यांंची चालती आहे. मुंडेंचा विदर्भात हस्तक्षेप नसला तरी ते यवतमाळसह विदर्भातील कार्यकर्त्यांंवर नेहमीच लक्ष ठेऊन राहायचे. येथील अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. जातीय समीकरणे, कार्यकर्त्यांंमधील पोटेन्शीयल, त्यांचा कुठे कसा उपयोग करून घ्यायचा याचा अभ्यास मुंडेंना होता. फाटक्या कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून मुंडेंची ओळख होती. मात्र आता गोपीनाथ मुंडे हयात नसल्याने हे तमाम सामान्य कार्यकर्ते वार्‍यावर सुटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या निष्ठावंतांचा कल कुणाकडे राहतो यावर युतीचे गणित बरेच अवलंबून राहणार आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)