शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

घाटंजीत एकहाती सत्ता, तरीही समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST

फोटो ग्राउंड रिपोर्ट भाग १ विठ्ठल कांबळे घाटंजी : येथील नगरपरिषदेत घाटी-घाटंजी विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह १८ पैकी १० सदस्य ...

फोटो

ग्राउंड रिपोर्ट भाग १

विठ्ठल कांबळे

घाटंजी : येथील नगरपरिषदेत घाटी-घाटंजी विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह १८ पैकी १० सदस्य निवडून आले. घाटंजीकरांनी त्यांना एकहाती सत्ता दिली. मात्र, एक वर्षाचा काळ अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संघर्षात वाया गेला, तर दोन वर्षांचा काळ कोरोनात गेला. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली आहे.

शहरात कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान राबविण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर लाखो रुपयांची तरतूद केली. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले.

अशा कचऱ्याचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेल्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. तरीही शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

घाटंजीकरांना जबाबदारीचा विसर

शहराच्या कोणत्याही भागात फेरफटका मारल्यास मुख्य आठवडी बाजार घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. पांढुर्णा रोड, गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण घाटंजीकरांनी ठेवण्याची गरज आहे.

बॉक्स

नवीन वसाहतीत रस्ते, नाल्या नाही

नवीन वस्तीत रस्ते, नाल्यांची सुविधा नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. त्याची दुर्गंधी पसरते. सरस्वतीनगरमध्ये ही परिस्थिती जाणवते. इतर भागातही तीच् स्थिती आहे

बॉक्स

अतिक्रमणाची समस्या कायम

शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, पोलीस स्टेशनसमोर अतिक्रमणाची समस्या आहे. दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच काही लोक आपल्या गाड्या पार्किंगला लावतात, तर काही गुरे, ढोरे भर रस्त्यात ठिय्या मांडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

बॉक्स

रस्त्याचे काम थांबले

पोलीस स्टेशन पाठीमागील वार्डातील संतोष भोयर यांच्या घरापासून ते पांढुर्णा नाल्यापर्यंतचा रोड मंजूर झाला. परंतु ते काम अंतर्गत वादाने थांबले आहे. त्या रस्त्यावर फक्त गिट्टी आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

बॉक्स

मंदिरावर वाढले गवत

घाटंजीचे ग्रामदैवत संत मारोती महाराज यांच्या मंदिरावर वृक्ष, गवत वाढले आहे. आजूबाजूने दुकाने लागली आहेत. अतिक्रमण वाढतच आहे. तेथे त्यांच्या नावाने यात्रा भरते. त्याचे उत्पन्न नगरपरिषदेला मिळते. तेथील अतिक्रमण हटवून मंदिराची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.