शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

पूस धरणात एक टक्काच साठा

By admin | Updated: May 29, 2016 02:33 IST

पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा : १ जूनपासून पुसदकरांना चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा पुसद : पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सहजपणे होऊ शकतो. एवढा जलसाठा पूस धरणात आहे. असे नगर पालिकेकडून संकेत देण्यात येत होते. मात्र एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तसेच धरणातून होणाऱ्या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. आज पूस धरणाचा जलसाठा केवळ एक टक्का आहे. पाणी पातळीतील ही प्रचंड घट चिंतेची बाब आहे. १ जूनपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले. महिनाभरापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जलसाठा नाममात्र उरल्यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी पाच दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहे. १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून २० जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. पूस धरणात एक टक्काच जलसाठा आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी कले आहे. नदीपात्रही कोरडेठाकमे महिना संपत असला तरी पुसदवासी प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ््याची तीव्रता वाढतच आहे. पूर्वी पूस नदीला भरपूर पाणी असल्याने मुले उन्हाळी सुटीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. मात्र यावर्षी पूस नदीचे पात्रही प्रचंड तापमानामुळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुले पोहण्याऐवजी केवळ व्हिडीओ गेम आणि मोबाईल गेममध्येच गुरफटून गेले आहेत. पूस नदी कोरडी पडल्याने उत्साही मुलांचा पुरता हिरमोड झालेला आहे. त्यातत विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाने चिमुकल्यांसाठी उन्हाळी सुटी एक प्रकारे त्रासदायकच ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी) सिंचन विभाग जबाबदार त्यातच अघोषित भारनियमनामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यापर्यंत पूस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. हजारो मोटारपंपाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा उपसा सुरू होता. जलसाठा स६ा टक्के उरला त्यावेळीही पाणी उपसा करण्यावर सिंचन विभागाने फार उशिरा धडक पावले उचलली. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात सिंचन विभागाने निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस कॅनॉलद्वारे पाणी सोडले, त्यामुळे धरणाचा जलसाठा कमी झाला आहे. सध्या पुसदकरांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला सिंचन विभागाचे अधिकारी पूर्णत: जबाबदार असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे.