शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पूस धरणात एक टक्काच साठा

By admin | Updated: May 29, 2016 02:33 IST

पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा : १ जूनपासून पुसदकरांना चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा पुसद : पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सहजपणे होऊ शकतो. एवढा जलसाठा पूस धरणात आहे. असे नगर पालिकेकडून संकेत देण्यात येत होते. मात्र एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तसेच धरणातून होणाऱ्या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. आज पूस धरणाचा जलसाठा केवळ एक टक्का आहे. पाणी पातळीतील ही प्रचंड घट चिंतेची बाब आहे. १ जूनपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले. महिनाभरापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जलसाठा नाममात्र उरल्यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी पाच दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहे. १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून २० जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. पूस धरणात एक टक्काच जलसाठा आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी कले आहे. नदीपात्रही कोरडेठाकमे महिना संपत असला तरी पुसदवासी प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ््याची तीव्रता वाढतच आहे. पूर्वी पूस नदीला भरपूर पाणी असल्याने मुले उन्हाळी सुटीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. मात्र यावर्षी पूस नदीचे पात्रही प्रचंड तापमानामुळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुले पोहण्याऐवजी केवळ व्हिडीओ गेम आणि मोबाईल गेममध्येच गुरफटून गेले आहेत. पूस नदी कोरडी पडल्याने उत्साही मुलांचा पुरता हिरमोड झालेला आहे. त्यातत विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाने चिमुकल्यांसाठी उन्हाळी सुटी एक प्रकारे त्रासदायकच ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी) सिंचन विभाग जबाबदार त्यातच अघोषित भारनियमनामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यापर्यंत पूस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. हजारो मोटारपंपाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा उपसा सुरू होता. जलसाठा स६ा टक्के उरला त्यावेळीही पाणी उपसा करण्यावर सिंचन विभागाने फार उशिरा धडक पावले उचलली. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात सिंचन विभागाने निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस कॅनॉलद्वारे पाणी सोडले, त्यामुळे धरणाचा जलसाठा कमी झाला आहे. सध्या पुसदकरांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला सिंचन विभागाचे अधिकारी पूर्णत: जबाबदार असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे.