शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

शंभर प्रश्न, तीन हजार कुटुंब अन् दोन दिवस

By admin | Updated: August 1, 2015 03:41 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे. नवनवीन प्रयोग केले जाता आहेत. आता शेतकरी आत्महत्येवर जणू पीएचडी करण्यासाठी शासनाने तलाठ्यांच्या हाती शंभर प्रश्नांची प्रश्नावली सोपविली आहे. ती भरून घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी त्यांना दिला आहे. त्यामुळे या मॅराथॉन सर्व्हेतून काय साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील स्थिती जाणून घेण्यासाठी तलाठ्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसात तब्बल तीन हजार कुटुंबाच्या उंबरठ्यावर जायचे आहे. त्यांच्याकडून परिपूर्ण अशी प्रश्नावली भरून घ्यायची आहे. प्रश्नांची संख्या, त्याची व्याप्ती पाहता, दिवसभरात दोनच प्रश्नावली कुटुंबाकडून भरून घेणे शक्य दिसते. अशा स्थिती ३ व ४ आॅगस्ट रोजी हा सर्व्हे पूर्ण करायचा कसा, असा प्रश्न काही सुज्ञ तलाठ्यांना पडला आहे. या सर्वेसाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा सर्व्हे करून शासन कोणता शोध प्रबंध तयार करणार असा संशय प्रश्नावली वाचल्यानंतर येते. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, बँक खाते, त्याच्याकडे असलेली जनावरे, स्वत:ची बैलजोडी नसल्यास येणाऱ्या अडचणी यासह तब्बल ९८ प्रश्न यामध्ये आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन किंवा चार पर्याय ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा उपाय योजनांच्या प्रयोगासाठी निवडला आहे. आता या प्रयोगातून कोणता निष्कर्ष हाती येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)