शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

शंभर प्रश्न, तीन हजार कुटुंब अन् दोन दिवस

By admin | Updated: August 1, 2015 03:41 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे. नवनवीन प्रयोग केले जाता आहेत. आता शेतकरी आत्महत्येवर जणू पीएचडी करण्यासाठी शासनाने तलाठ्यांच्या हाती शंभर प्रश्नांची प्रश्नावली सोपविली आहे. ती भरून घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी त्यांना दिला आहे. त्यामुळे या मॅराथॉन सर्व्हेतून काय साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील स्थिती जाणून घेण्यासाठी तलाठ्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसात तब्बल तीन हजार कुटुंबाच्या उंबरठ्यावर जायचे आहे. त्यांच्याकडून परिपूर्ण अशी प्रश्नावली भरून घ्यायची आहे. प्रश्नांची संख्या, त्याची व्याप्ती पाहता, दिवसभरात दोनच प्रश्नावली कुटुंबाकडून भरून घेणे शक्य दिसते. अशा स्थिती ३ व ४ आॅगस्ट रोजी हा सर्व्हे पूर्ण करायचा कसा, असा प्रश्न काही सुज्ञ तलाठ्यांना पडला आहे. या सर्वेसाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा सर्व्हे करून शासन कोणता शोध प्रबंध तयार करणार असा संशय प्रश्नावली वाचल्यानंतर येते. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, बँक खाते, त्याच्याकडे असलेली जनावरे, स्वत:ची बैलजोडी नसल्यास येणाऱ्या अडचणी यासह तब्बल ९८ प्रश्न यामध्ये आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन किंवा चार पर्याय ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा उपाय योजनांच्या प्रयोगासाठी निवडला आहे. आता या प्रयोगातून कोणता निष्कर्ष हाती येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)