शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शंभर प्रश्न, तीन हजार कुटुंब अन् दोन दिवस

By admin | Updated: August 1, 2015 03:41 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे. नवनवीन प्रयोग केले जाता आहेत. आता शेतकरी आत्महत्येवर जणू पीएचडी करण्यासाठी शासनाने तलाठ्यांच्या हाती शंभर प्रश्नांची प्रश्नावली सोपविली आहे. ती भरून घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी त्यांना दिला आहे. त्यामुळे या मॅराथॉन सर्व्हेतून काय साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील स्थिती जाणून घेण्यासाठी तलाठ्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसात तब्बल तीन हजार कुटुंबाच्या उंबरठ्यावर जायचे आहे. त्यांच्याकडून परिपूर्ण अशी प्रश्नावली भरून घ्यायची आहे. प्रश्नांची संख्या, त्याची व्याप्ती पाहता, दिवसभरात दोनच प्रश्नावली कुटुंबाकडून भरून घेणे शक्य दिसते. अशा स्थिती ३ व ४ आॅगस्ट रोजी हा सर्व्हे पूर्ण करायचा कसा, असा प्रश्न काही सुज्ञ तलाठ्यांना पडला आहे. या सर्वेसाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा सर्व्हे करून शासन कोणता शोध प्रबंध तयार करणार असा संशय प्रश्नावली वाचल्यानंतर येते. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, बँक खाते, त्याच्याकडे असलेली जनावरे, स्वत:ची बैलजोडी नसल्यास येणाऱ्या अडचणी यासह तब्बल ९८ प्रश्न यामध्ये आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन किंवा चार पर्याय ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा उपाय योजनांच्या प्रयोगासाठी निवडला आहे. आता या प्रयोगातून कोणता निष्कर्ष हाती येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)