शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

‘ग्रामस्वराज्य’त शंभर टक्के विद्युतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:22 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या यवतमाळ मंडळ कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील १३ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१३ गावांचा समावेश : डेहणी येथून ग्रामस्वराज्य अभियानाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या यवतमाळ मंडळ कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील १३ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून ग्रामस्वराज्य अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाची सुरूवात बाभूळगाव तालुक्यातील डेहणी येथे झाली. मधूकर देवाजी मेश्राम यांना अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे व कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे यांच्या हस्ते वीज जोडणी देऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच राहुल मेश्राम, पोलीस पाटील दत्ताजी राऊत, माजी सरपंच वसंत राऊत, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महावितरण ग्रामस्वराज्य अभियानात जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गावनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत.१४ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान महावितरणच्या वतीने या १३ मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील डेहणी, कळंबच्या शेराड, नेरमधील वटफळी, पुसद तालुक्यातील वालतुर, हुडी (बु), पांडुर्णा (बु), देवठाणा, जवळा, दगड धानोरा, हिवळणी आणि उमरखेड तालुक्यातील मन्याळी, करंजी, सावळेश्वर गावांचा समावेश आहे. ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावांचा या योजनेत समावेश आहे. महावितरणच्या मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांनी केले.