शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

४५ किलोमीटरसाठी दीड तास

By admin | Updated: March 15, 2015 00:28 IST

नेर-कारंजा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे वाहनधारक त्रस्त झाले आहे.

नेर : नेर-कारंजा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे वाहनधारक त्रस्त झाले आहे. ४५ किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा वेळ लागतो. शिवाय किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सदर मार्गावर अनेक खेडे आणि मोठी गावे आहेत. या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या जलद बसेसलाही अनेक ठिकाणी थांबा आहे. लोही हे गाव त्यातीलच एक आहे. येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसची गती अतिशय कमी राहत असल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांना निर्धारित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. या रस्त्याची डागडुजी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र वारंवार जैसेथे परिस्थती होते. यावरून डागडुजीच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काहींना प्राणही गमवावे लागत आहे. सदर मार्गावर बसेसची संख्या कमी असल्याने सोडल्या जाणाऱ्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या जातात. या स्थितीतही बस निश्चित ठिकाणी विनाविघ्न पोहोचेलच याची शाश्वती नसते. अनेकदा पंक्चर आणि नादुरूस्त होण्याचे प्रकार घडले आहेत. सदर रस्ता दुरूस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी संबंधित कार्यालयाचे आणि लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजविले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. याबाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. वर्दळीचा रस्ता असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी हा विषय गांभिर्याने घेत नाहीत. एसटी महामंडळी पाठपुरावा करत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना होतो. (तालुका प्रतिनिधी)