शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

पुसदमध्ये साडेसात कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने न्याय मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खटल्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या दृष्टीने लोक न्यायालयाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येथील न्यायमंदिरात रविवारी झालेल्या लोक न्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण एक हजार ८१९ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकन्यायालय : २३३ प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील न्यायमंदिरात रविवारी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी. गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात आली. या लोकन्यायालयात विविध २३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून तब्बल सात कोटी ५५ लाख ३२ हजार ८८० रुपयांचे तडजोड शुल्क जमा करण्यात आले.न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने न्याय मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खटल्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या दृष्टीने लोक न्यायालयाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येथील न्यायमंदिरात रविवारी झालेल्या लोक न्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण एक हजार ८१९ प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली. यात मोटर व्हेईकल अ‍ॅक्टची सर्वाधिक एक हजार ४८६ प्रकरणे होती. एकूण २३३ प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यात आला.यात मोटर वाहन कायद्याची ८० प्रकरणे, एनआय अ‍ॅक्ट ९८, एमएसीटी ७, भूसंपादन ३६ व सिव्हिल ९ प्रकरणांचा समावेश आहे. लोकन्यायालयामुळे रेंगाळणारी अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. त्यामुळे दिवसेंदिवस लोक न्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकन्यायालयाच्या कामकाजासाठी सहा पॅनल्स तयार करण्यात आले होते. त्यावरील पॅनलच्या सदस्यांनी न्यायदानाची जबाबदारी पार पडली. सहा पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी. गावंडे, न्यायाधीश के.एफ.एम. खान, न्यायाधीश ए.डी. मारगोडे, न्यायाधीश ए.एच. बाजड, न्यायाधीश एम.बी. सोनटक्के, न्यायाधीश जी.बी. पवार, न्यायाधीश पी.आर. फुलारी, न्यायाधीश ए.एस. शिंदे, न्यायाधीश एम.एम. वर्मा, अ‍ॅड.डी.एस. देशपांडे, डॉ. भालचंद्र देशमुख, अ‍ॅड. अर्चना मोरे, गणेश धर्माळे, अ‍ॅड.व्ही.व्ही. जामकर, प्रा. प्रदीप दुधाट, अ‍ॅड. आरती मस्के, प्रा.एस.एस. पाटील, अ‍ॅड.एन.एच. मुळे, प्रा. दिनकर गुल्हाने, अ‍ॅड.आर.एम. वाघमारे, दिनेश कदम आदींचा समावेश होता. अधीक्षक आर.यू. पाचंगे, लिपिक डी.डी. आराळे, लघुलेखक व्ही.बी. वानखेडे, आवंडकर व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.लोकन्यायालयातून त्वरित न्याय मिळतो. बरीचशी रेंगाळलेली प्रकरणे लवकर निकाली निघतात. त्यामुळे न्यायालयावरील ताण कमी होतो. ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यासाठी लोक न्यायालयाचा पक्षकारांनी लाभ घ्यावा.- एस.बी. गावंडे,अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, तथा जिल्हा न्यायाधीश-१ 

टॅग्स :bankबँक