शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पंढरीच्या वाटेत वारकऱ्यांना मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’, वारीच्या मार्गात होणार असाक्षरांची नोंदणी

By अविनाश साबापुरे | Updated: June 30, 2024 20:54 IST

गावी येताच दिले जाणार धडे अन् सप्टेंबरमध्ये परीक्षा

यवतमाळ: आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची वाटेतच साक्षरता मोहिमेसाठी नोंदणी केली जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर गावी परतल्यावर या वारकऱ्यांना स्थानिक शिक्षकांमार्फत धडे दिले जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेऊन साक्षरतेचे प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावच्या अशिक्षित वारकऱ्यांना यंदा पांडुरंग साक्षरतेच्या रुपाने पावणार आहे.

वारीदरम्यान करावयाच्या या नोंदणीसाठी योजना शिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारीच लेखी सूचित केले आहे. सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश खेड्यांतून शेकडो वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. दररोज ३० ते ४० किलोमिटर पायी चालून हे वारकरी एखाद्या गावात मुक्काम करतात. अशा ठिकाणी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे’ पथक त्यांच्या भेटी घेणार आहे. वारकऱ्यांमधील जे लोक असाक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंद करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावातील शाळेचीही मदत घेतली जाणार आहे. आणि हे वारकरी जेव्हा एकादशीनंतर आपापल्या गावात परत जातील, तेव्हा त्यांना गावातील शाळा-शिक्षक किंवा नवभारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांच्या मदतीने साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका..!आळंदी आणि देहू येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरीकडे निघालेली आहे. या दिंडीमध्ये ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ची माहिती सांगणारी व्हॅन सहभागी आहे. त्यामध्ये शिक्षक-स्वयंसेवकाचे एक पथक आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी पथनाट्य, बॅनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्यांचे फ्लेक्स, ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका’ अशा गीतांच्या माध्यमातून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी बोलून नियोजन केल्याचे योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमाबाबत माहिती होणार आहे. वारी संपल्यानंतर ते जेव्हा गावी परत जातील तेव्हा संबंधित शाळेत असाक्षरांची स्वयंसेवकांबरोबर टॅगिंग केली जाईल. त्यानंतर अध्यापनही सुरु केले जाईल. सप्टेंबर किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेसही त्यांना बसता येईल. त्यानंतर त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.- डाॅ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ