शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पंढरीच्या वाटेत वारकऱ्यांना मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’, वारीच्या मार्गात होणार असाक्षरांची नोंदणी

By अविनाश साबापुरे | Updated: June 30, 2024 20:54 IST

गावी येताच दिले जाणार धडे अन् सप्टेंबरमध्ये परीक्षा

यवतमाळ: आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची वाटेतच साक्षरता मोहिमेसाठी नोंदणी केली जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर गावी परतल्यावर या वारकऱ्यांना स्थानिक शिक्षकांमार्फत धडे दिले जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेऊन साक्षरतेचे प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावच्या अशिक्षित वारकऱ्यांना यंदा पांडुरंग साक्षरतेच्या रुपाने पावणार आहे.

वारीदरम्यान करावयाच्या या नोंदणीसाठी योजना शिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारीच लेखी सूचित केले आहे. सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश खेड्यांतून शेकडो वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. दररोज ३० ते ४० किलोमिटर पायी चालून हे वारकरी एखाद्या गावात मुक्काम करतात. अशा ठिकाणी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे’ पथक त्यांच्या भेटी घेणार आहे. वारकऱ्यांमधील जे लोक असाक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंद करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावातील शाळेचीही मदत घेतली जाणार आहे. आणि हे वारकरी जेव्हा एकादशीनंतर आपापल्या गावात परत जातील, तेव्हा त्यांना गावातील शाळा-शिक्षक किंवा नवभारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांच्या मदतीने साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका..!आळंदी आणि देहू येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरीकडे निघालेली आहे. या दिंडीमध्ये ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ची माहिती सांगणारी व्हॅन सहभागी आहे. त्यामध्ये शिक्षक-स्वयंसेवकाचे एक पथक आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी पथनाट्य, बॅनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्यांचे फ्लेक्स, ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका’ अशा गीतांच्या माध्यमातून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी बोलून नियोजन केल्याचे योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमाबाबत माहिती होणार आहे. वारी संपल्यानंतर ते जेव्हा गावी परत जातील तेव्हा संबंधित शाळेत असाक्षरांची स्वयंसेवकांबरोबर टॅगिंग केली जाईल. त्यानंतर अध्यापनही सुरु केले जाईल. सप्टेंबर किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेसही त्यांना बसता येईल. त्यानंतर त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.- डाॅ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ