शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या वाटेत वारकऱ्यांना मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’, वारीच्या मार्गात होणार असाक्षरांची नोंदणी

By अविनाश साबापुरे | Updated: June 30, 2024 20:54 IST

गावी येताच दिले जाणार धडे अन् सप्टेंबरमध्ये परीक्षा

यवतमाळ: आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची वाटेतच साक्षरता मोहिमेसाठी नोंदणी केली जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर गावी परतल्यावर या वारकऱ्यांना स्थानिक शिक्षकांमार्फत धडे दिले जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेऊन साक्षरतेचे प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावच्या अशिक्षित वारकऱ्यांना यंदा पांडुरंग साक्षरतेच्या रुपाने पावणार आहे.

वारीदरम्यान करावयाच्या या नोंदणीसाठी योजना शिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारीच लेखी सूचित केले आहे. सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश खेड्यांतून शेकडो वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. दररोज ३० ते ४० किलोमिटर पायी चालून हे वारकरी एखाद्या गावात मुक्काम करतात. अशा ठिकाणी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे’ पथक त्यांच्या भेटी घेणार आहे. वारकऱ्यांमधील जे लोक असाक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंद करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावातील शाळेचीही मदत घेतली जाणार आहे. आणि हे वारकरी जेव्हा एकादशीनंतर आपापल्या गावात परत जातील, तेव्हा त्यांना गावातील शाळा-शिक्षक किंवा नवभारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांच्या मदतीने साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका..!आळंदी आणि देहू येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरीकडे निघालेली आहे. या दिंडीमध्ये ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ची माहिती सांगणारी व्हॅन सहभागी आहे. त्यामध्ये शिक्षक-स्वयंसेवकाचे एक पथक आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी पथनाट्य, बॅनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्यांचे फ्लेक्स, ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका’ अशा गीतांच्या माध्यमातून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी बोलून नियोजन केल्याचे योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमाबाबत माहिती होणार आहे. वारी संपल्यानंतर ते जेव्हा गावी परत जातील तेव्हा संबंधित शाळेत असाक्षरांची स्वयंसेवकांबरोबर टॅगिंग केली जाईल. त्यानंतर अध्यापनही सुरु केले जाईल. सप्टेंबर किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेसही त्यांना बसता येईल. त्यानंतर त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.- डाॅ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ