शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दारव्हा तालुक्यात पुराने हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:39 IST

तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे.

ठळक मुद्दे१९४ जनावरे दगावली : १३७२ घरांची पडझड, ६५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे.तालुक्यात १५ तासांत तालुक्यात तब्बल १२१.४२ मिमी पाऊस झाला. १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी २९.४२ मिमी, तर गुरूवारी तब्बल ९२ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिमी आहे. सध्या एकूण ६५९.८६ मिमी पाऊस पडला. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाले.यावर्षी तालुक्यात ३३ हजार ४00 हेक्टरवर कापूस, २२ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५00 हेक्टरवर तूर, ४०९ हेक्टरवर मूग, ३६५ हेक्टरवर उडीद यासह फळबाग व इतर पिकांची लागवड झाली. या सर्वच क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हरू, रामगाव (रामेश्वर), दत्तापूर, अंतरगाव, धामणगाव, महातोली, दयार्पूर यासह काही गावातील १00 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. हातनी, भांडेगाव, हातोला, जवळा, हरू येथे पुरात बैल, दोन म्हशी, दोन गाय, सहा शेळ्या, यासह काही ठिकाणी जनावरे वाहून गेली. कोहळा येथे झाड कोसळल्याने एका गायीचा मृत्यू झाला. अनेक गावांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.नुकसानीचे सर्वेक्षण सुरूपावसामुळे तालुक्यात १४ घरे पूर्णत: बाधीत झाली. १३७२ घरांची पडझड झाली. यामुळे २४८ कुटुंबे पूर्णपणे बाधीत झाली आही. याशिवाय तालुक्यात १९४ जनावरे दगावली आहे. प्रशासनाने नुकसानीच्या सवेक्षर्णाच्या सूचना दिल्या. गुरूवारी रात्री उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे, नायब तहसीलदार एस.जे. सरागे व एस.एम. होटे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी नुकसानग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. शुक्रवारी पडझड घरांच्या सर्वेक्षणासाठी तलाठी, ग्रामसेवक व शाखा अभियंता, तर शेती पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाकरिता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांचे पथक तयार करून सर्वेक्षणाला सुरूवात झाली.अडाणचे पाच दरवाजे उघडलेदारव्हा तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेला म्हसनी येथील अडाण प्रकल्प ९० टक्के भरला. या प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आला. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुंभारकिन्ही, अंतरगाव यासह सर्वच प्रकल्पाने पूर्ण पातळी गाठली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर