शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

वृद्धांची गर्दी, १० तलाठी गायब

By admin | Updated: June 13, 2016 00:56 IST

तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते.

आर्णी तहसीलमध्ये गोंधळ : तहसीलदार म्हणाले, चकरा मारू नका!आर्णी : तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र काही तरी लाभच मिळणार आहे, या अपेक्षेपोटी तालुकाभरातील वृद्ध लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये गर्दी केली. भरीस भर म्हणजे ऐनवेळी संबंधित काम करणारे तब्बल दहा तलाठी गैरहजर असल्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले. वृद्धांना आल्या पावली परत जावे लागले. श्रावणबाळ सेवा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ आर्णी शहरातील लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. हयातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूक या कागदपत्रांसह १७०० लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परंतु ज्याअर्थी लाभार्थ्यांना बोलावले आहे, त्याअर्थी काहीतरी विशेष लाभ देण्यात येणार आहे, असा समज पसरला. त्यामुळे शहरातीलच नव्हेतर संपूर्ण तालुक्यातून वृद्ध लाभार्थ्यांनी आर्णी तहसील कार्यालयाकडे एकच धाव घेतली. त्यामुळे दिवसभर तहसील परिसरात झुंबड उडाली होती. अचानक आलेल्या अतिरिक्त लाभार्थ्यांमुळे कार्यालयात गोंधळ उडाला. शहरातील बोलावण्यात आलेल्या १७०० लाभार्थ्यांसंदर्भातची कामे करण्यात येणार होती. त्या कामाशी संबंधित कर्मचारीच गायब होते. तहसील कार्यालयात संबंधित १० तलाठी गैरहजर असल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. प्रशासनाने आपल्याला विनाकारण बोलावून त्रास दिला, ही भावना बळावल्याने लाभार्थीही सैरवैर झाले. या गर्दीचे नियोजन करणे तहसील प्रशासनाला कठीण होवून बसले होते. काही थोडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हजर होते. परंतु संबंधित काम त्यांच्याकडे नसल्यामुळे कोणत्याच लाभार्थ्याचे समाधान होऊ शकले नाही. या लाभार्थ्यांची अवस्था कळताच आमदार ख्वाजा बेग यांनीसुद्धा भेट दिली. मदत करण्याचे त्यांनी आश्वासनही दिले. यावेळी राजेंद्र शिवरामवार, निलंकुश चव्हाण हजर होते. दरम्यान, तहसीलदार सुधीर पवार म्हणाले की, आम्ही शहरातील लाभार्थ्यांनाच बोलावले होते. परंतु इतर ठिकाणावरूनही लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला. आता संबंधित कागदपत्रे आम्ही तलाठ्यामार्फतच गोळा करणार आहो. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याने तहसील कार्यालयात चकरा मारू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले. मात्र त्यामुळे वृद्ध लाभार्थ्यांचे समाधान झाले नाही. (शहर प्रतिनिधी)संजय गांधी निराधार योजनेत अनेक तक्रारीसंजय गांधी निराधार योजनेत मोठा गोंधळ आहे. यात अनेक बोगस लाभार्थी घुसडण्यात आल्याचे मागील वर्षी उजेडात आले होते. रमाकांत कोल्हे रा.शेंदूरसणी यांनी केलेल्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजनेतील घोळाचे प्रकरण समोर आले होते. यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर अद्यापही कारवाईसुद्धा झालेली नाही. त्यामुळे कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.