शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वृद्धांची गर्दी, १० तलाठी गायब

By admin | Updated: June 13, 2016 00:56 IST

तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते.

आर्णी तहसीलमध्ये गोंधळ : तहसीलदार म्हणाले, चकरा मारू नका!आर्णी : तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र काही तरी लाभच मिळणार आहे, या अपेक्षेपोटी तालुकाभरातील वृद्ध लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये गर्दी केली. भरीस भर म्हणजे ऐनवेळी संबंधित काम करणारे तब्बल दहा तलाठी गैरहजर असल्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले. वृद्धांना आल्या पावली परत जावे लागले. श्रावणबाळ सेवा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ आर्णी शहरातील लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. हयातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूक या कागदपत्रांसह १७०० लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परंतु ज्याअर्थी लाभार्थ्यांना बोलावले आहे, त्याअर्थी काहीतरी विशेष लाभ देण्यात येणार आहे, असा समज पसरला. त्यामुळे शहरातीलच नव्हेतर संपूर्ण तालुक्यातून वृद्ध लाभार्थ्यांनी आर्णी तहसील कार्यालयाकडे एकच धाव घेतली. त्यामुळे दिवसभर तहसील परिसरात झुंबड उडाली होती. अचानक आलेल्या अतिरिक्त लाभार्थ्यांमुळे कार्यालयात गोंधळ उडाला. शहरातील बोलावण्यात आलेल्या १७०० लाभार्थ्यांसंदर्भातची कामे करण्यात येणार होती. त्या कामाशी संबंधित कर्मचारीच गायब होते. तहसील कार्यालयात संबंधित १० तलाठी गैरहजर असल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. प्रशासनाने आपल्याला विनाकारण बोलावून त्रास दिला, ही भावना बळावल्याने लाभार्थीही सैरवैर झाले. या गर्दीचे नियोजन करणे तहसील प्रशासनाला कठीण होवून बसले होते. काही थोडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हजर होते. परंतु संबंधित काम त्यांच्याकडे नसल्यामुळे कोणत्याच लाभार्थ्याचे समाधान होऊ शकले नाही. या लाभार्थ्यांची अवस्था कळताच आमदार ख्वाजा बेग यांनीसुद्धा भेट दिली. मदत करण्याचे त्यांनी आश्वासनही दिले. यावेळी राजेंद्र शिवरामवार, निलंकुश चव्हाण हजर होते. दरम्यान, तहसीलदार सुधीर पवार म्हणाले की, आम्ही शहरातील लाभार्थ्यांनाच बोलावले होते. परंतु इतर ठिकाणावरूनही लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला. आता संबंधित कागदपत्रे आम्ही तलाठ्यामार्फतच गोळा करणार आहो. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याने तहसील कार्यालयात चकरा मारू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले. मात्र त्यामुळे वृद्ध लाभार्थ्यांचे समाधान झाले नाही. (शहर प्रतिनिधी)संजय गांधी निराधार योजनेत अनेक तक्रारीसंजय गांधी निराधार योजनेत मोठा गोंधळ आहे. यात अनेक बोगस लाभार्थी घुसडण्यात आल्याचे मागील वर्षी उजेडात आले होते. रमाकांत कोल्हे रा.शेंदूरसणी यांनी केलेल्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजनेतील घोळाचे प्रकरण समोर आले होते. यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर अद्यापही कारवाईसुद्धा झालेली नाही. त्यामुळे कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.