शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांची गर्दी, १० तलाठी गायब

By admin | Updated: June 13, 2016 00:56 IST

तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते.

आर्णी तहसीलमध्ये गोंधळ : तहसीलदार म्हणाले, चकरा मारू नका!आर्णी : तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र काही तरी लाभच मिळणार आहे, या अपेक्षेपोटी तालुकाभरातील वृद्ध लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये गर्दी केली. भरीस भर म्हणजे ऐनवेळी संबंधित काम करणारे तब्बल दहा तलाठी गैरहजर असल्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले. वृद्धांना आल्या पावली परत जावे लागले. श्रावणबाळ सेवा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ आर्णी शहरातील लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. हयातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूक या कागदपत्रांसह १७०० लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परंतु ज्याअर्थी लाभार्थ्यांना बोलावले आहे, त्याअर्थी काहीतरी विशेष लाभ देण्यात येणार आहे, असा समज पसरला. त्यामुळे शहरातीलच नव्हेतर संपूर्ण तालुक्यातून वृद्ध लाभार्थ्यांनी आर्णी तहसील कार्यालयाकडे एकच धाव घेतली. त्यामुळे दिवसभर तहसील परिसरात झुंबड उडाली होती. अचानक आलेल्या अतिरिक्त लाभार्थ्यांमुळे कार्यालयात गोंधळ उडाला. शहरातील बोलावण्यात आलेल्या १७०० लाभार्थ्यांसंदर्भातची कामे करण्यात येणार होती. त्या कामाशी संबंधित कर्मचारीच गायब होते. तहसील कार्यालयात संबंधित १० तलाठी गैरहजर असल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. प्रशासनाने आपल्याला विनाकारण बोलावून त्रास दिला, ही भावना बळावल्याने लाभार्थीही सैरवैर झाले. या गर्दीचे नियोजन करणे तहसील प्रशासनाला कठीण होवून बसले होते. काही थोडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हजर होते. परंतु संबंधित काम त्यांच्याकडे नसल्यामुळे कोणत्याच लाभार्थ्याचे समाधान होऊ शकले नाही. या लाभार्थ्यांची अवस्था कळताच आमदार ख्वाजा बेग यांनीसुद्धा भेट दिली. मदत करण्याचे त्यांनी आश्वासनही दिले. यावेळी राजेंद्र शिवरामवार, निलंकुश चव्हाण हजर होते. दरम्यान, तहसीलदार सुधीर पवार म्हणाले की, आम्ही शहरातील लाभार्थ्यांनाच बोलावले होते. परंतु इतर ठिकाणावरूनही लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला. आता संबंधित कागदपत्रे आम्ही तलाठ्यामार्फतच गोळा करणार आहो. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याने तहसील कार्यालयात चकरा मारू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले. मात्र त्यामुळे वृद्ध लाभार्थ्यांचे समाधान झाले नाही. (शहर प्रतिनिधी)संजय गांधी निराधार योजनेत अनेक तक्रारीसंजय गांधी निराधार योजनेत मोठा गोंधळ आहे. यात अनेक बोगस लाभार्थी घुसडण्यात आल्याचे मागील वर्षी उजेडात आले होते. रमाकांत कोल्हे रा.शेंदूरसणी यांनी केलेल्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजनेतील घोळाचे प्रकरण समोर आले होते. यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर अद्यापही कारवाईसुद्धा झालेली नाही. त्यामुळे कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.