शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, तलाठ्यांचा तहसीलभोवती ठिय्या

By admin | Updated: November 25, 2014 23:04 IST

तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण

वणी : तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यांना वणीत येऊन आपल्या कामांचा निपटारा करवून घ्यावा लागत आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना साजे नेमून देण्यात आले आहेत. संबंधित साजात पोहोचून त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांची कामे करावीत, अशी अपेक्षा असते. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी जाऊनही तलाठी व मंडळ अधिकारी ग्रामस्थांना भेटतच नाहीत. परिणामी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ अनेक तलाठी शहरात किरायाने राहतात. अनेकदा खोली बदल होत असल्याने ग्रामस्थांना ते गवसतच नाहीत. अशावेळी तर ग्रामस्थ, शेतकऱ्यांची चांगलीच परवड होताना दिसून येते.येथील तहसील कार्यालयात गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने रूजू झालेले काही मंडळ अधिकारी, तर तहसील कार्यालयातच ठिय्या मांडून दिसतात. काही मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे मागे खांदेपालट झाले. मंडळ अधिकारी शिरस्तेदार, तर शिरस्तेदार मंडळ अधिकारी झाले. मात्र अशा मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगातून अद्याप शिरस्तेदार पदच गेलेच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठ्यांना फेरफार रजिस्टरवर मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याकरिता रजिस्टर घेऊन तहसील कार्यालय गाठावे लागते. परिणामी मंडळ अधिकारी अन् तलाठीही साजात आढळत नाही. तहसील कार्यालयातच काही मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करतात़ काही कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी आपल्या मंडळातील अचूक माहिती ठेवतात, मुख्यालयाला भेटीही देतात. ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवितात. मात्र काही मंडळ अधिकारी तर सतत तहसील कार्यालयाच्या भोवतीच फिरून आपल्या परिसराचा कारभार हाकतात, असे स्पष्ट होत आहे. तहसीमध्ये वावरणाऱ्या अशा मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या मंडळातील समस्याच दिसत नाहीत. त्यामुळे एकाही शेतकऱ्याची समस्या सुटताना दिसत नाही. काही मंडळ अधिकारी तहसील कार्यालयातच बसून राहत असल्याने काही कर्तव्यदक्ष तलाठ्यांना त्यांना शोधत तहसील कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. मंडळ अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने काही तलाठ्यांची दमछाक होत आहे़ अनेक व्यवहारांचे फेरफार लिहून तलाठ्याने ठेवले असताना आणि नियोजित २१ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांचे फेरफार होत नाही़ त्यामुळे शेतकरी तलाठ्यावर रोष व्यक्त करतात़ त्याला काही तलाठीही दोषी असतात. तथापि त्यांच्या वरील अधिकारी म्हणून मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते़ तेच कर्तव्यदक्ष नसतील, तर महसूल मंडळाचे काय होणार, अशी चर्चा आता होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)