शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

मजुरांच्या मदतीसाठी अधिकारी पोहोचले विटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : कुणीही उपाशी न राहण्यासाठी प्रशासनाची धावपळ, परप्रांतीयांचीही घेतली जातेय काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक परप्रांतीय आणि इतर जिल्ह्यातील नागरिक अडकले आहे. अशांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील विटभट्ट्या व इतर कामाची ठिकाणे गाठून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली.तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा तसेच राज्याच्या सीमा सील केल्या आहे. त्यामुळे कामे बंद असली तरी अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही.महागाव (क) येथे तेलंगणा राज्यातील २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ नागरिक आहे. यामधील काही जण आयुर्वेदिक जडबुटी विकण्याकरिता तर काही शेतीकामाकरिता आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने धान्य व साबण, सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. मोझर येथे विटभट्टीवर काम करण्याकरिता छत्तीसगढचे ५४ मजूर आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीने अडीच क्विंटल तांदूळ व इतर वस्तूंचा पुरवठा केला. बोरी येथील विटभट्टीवर छत्तीसगढचेच २३ मजूर असून त्यांना विटभट्टी मालकाने जीवनावश्यक वस्तू पुरविल्या.याप्रमाणे हे नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले असून त्यांची स्थानिक पातळीवर व्यवस्था करण्यात आली आहे. तरीसुद्धा कुणीही उपाशीपोटी राहू नये, या भावनेतून तालुका प्रशासनाने या सर्व ठिकाणी भेटी देऊन त्यांच्या जेवण व राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांची विचारपूस करून काही समस्या आहे का, अशी विचारणा करून धीर दिला. त्यांना प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आमची गावी जाण्याची व्यवस्था कराआम्हाला या ठिकाणी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे. काही कमी-जास्त असल्यास तेही सहन करू. परंतु आमची गावी जाण्याची काहीतरी व्यवस्था करा, अशी विनवनी या नागरिकांनी प्रशासनाला केली. रोजगार बंद झाल्यामुळे हातात काहीच पैसे नाही. त्यामुळे भविष्यात कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्या, या विवंचनेत सर्व मजूरवर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या