शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या मदतीसाठी अधिकारी पोहोचले विटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : कुणीही उपाशी न राहण्यासाठी प्रशासनाची धावपळ, परप्रांतीयांचीही घेतली जातेय काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक परप्रांतीय आणि इतर जिल्ह्यातील नागरिक अडकले आहे. अशांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील विटभट्ट्या व इतर कामाची ठिकाणे गाठून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली.तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा तसेच राज्याच्या सीमा सील केल्या आहे. त्यामुळे कामे बंद असली तरी अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही.महागाव (क) येथे तेलंगणा राज्यातील २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ नागरिक आहे. यामधील काही जण आयुर्वेदिक जडबुटी विकण्याकरिता तर काही शेतीकामाकरिता आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने धान्य व साबण, सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. मोझर येथे विटभट्टीवर काम करण्याकरिता छत्तीसगढचे ५४ मजूर आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीने अडीच क्विंटल तांदूळ व इतर वस्तूंचा पुरवठा केला. बोरी येथील विटभट्टीवर छत्तीसगढचेच २३ मजूर असून त्यांना विटभट्टी मालकाने जीवनावश्यक वस्तू पुरविल्या.याप्रमाणे हे नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले असून त्यांची स्थानिक पातळीवर व्यवस्था करण्यात आली आहे. तरीसुद्धा कुणीही उपाशीपोटी राहू नये, या भावनेतून तालुका प्रशासनाने या सर्व ठिकाणी भेटी देऊन त्यांच्या जेवण व राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांची विचारपूस करून काही समस्या आहे का, अशी विचारणा करून धीर दिला. त्यांना प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आमची गावी जाण्याची व्यवस्था कराआम्हाला या ठिकाणी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे. काही कमी-जास्त असल्यास तेही सहन करू. परंतु आमची गावी जाण्याची काहीतरी व्यवस्था करा, अशी विनवनी या नागरिकांनी प्रशासनाला केली. रोजगार बंद झाल्यामुळे हातात काहीच पैसे नाही. त्यामुळे भविष्यात कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्या, या विवंचनेत सर्व मजूरवर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या