शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Updated: December 21, 2015 02:44 IST

शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.

किशोर तिवारी : राळेगाव येथे चेतना अभियानांतर्गत मार्गदर्शन, ग्रामस्तरीय समितीच्या कार्याविषयी दिली माहितीराळेगाव : शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. ग्रामस्तरीय समितीचे सदस्य, सरपंच, पटवारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक आदींनी शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत येथे झालेल्या पहिल्या ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना ते मार्गदर्शन करीत होते. प्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक मिना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, ठमके, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, सुरेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेश कवळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अशोक केवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आदी उपस्थित होते.किशोर तिवारी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता अनेक निर्णय घेतले आहे. ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून एक लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यातून कर्ज उपलब्ध करून द्यावे. पटवाऱ्याकडे अर्ज देताच पुढील कारवाई करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी, आजारी शेतकऱ्याची पुरेपूर काळजी घेतली जावी, प्रशासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून या ग्रामस्तरीय समितीने आपली भूमिका पार पाडावी, त्यांना आधार द्यावा शासना त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. सरपंचांनी समिती सदस्यांच्या सहकार्यांनी कर्जबाजारी व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन गावात एकही शेतकरी आत्महत्याहोणार नाही याकड लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. ग्रामस्तरीय समितीने कशा पद्धतीने कार्य करावे याबाबत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. राजेश काळे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)