शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Updated: December 21, 2015 02:44 IST

शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.

किशोर तिवारी : राळेगाव येथे चेतना अभियानांतर्गत मार्गदर्शन, ग्रामस्तरीय समितीच्या कार्याविषयी दिली माहितीराळेगाव : शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. ग्रामस्तरीय समितीचे सदस्य, सरपंच, पटवारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक आदींनी शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत येथे झालेल्या पहिल्या ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना ते मार्गदर्शन करीत होते. प्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक मिना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, ठमके, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, सुरेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेश कवळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अशोक केवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आदी उपस्थित होते.किशोर तिवारी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता अनेक निर्णय घेतले आहे. ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून एक लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यातून कर्ज उपलब्ध करून द्यावे. पटवाऱ्याकडे अर्ज देताच पुढील कारवाई करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी, आजारी शेतकऱ्याची पुरेपूर काळजी घेतली जावी, प्रशासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून या ग्रामस्तरीय समितीने आपली भूमिका पार पाडावी, त्यांना आधार द्यावा शासना त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. सरपंचांनी समिती सदस्यांच्या सहकार्यांनी कर्जबाजारी व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन गावात एकही शेतकरी आत्महत्याहोणार नाही याकड लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. ग्रामस्तरीय समितीने कशा पद्धतीने कार्य करावे याबाबत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. राजेश काळे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)