शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मजुरी करून बारावीत मिळविले ८२ टक्के

By admin | Updated: May 28, 2016 02:31 IST

घरी भौतिक सुखसुविधांची ददात. शिकवणी लावायला पैसा नाही. प्रसंगी महाविद्यालयातही पायी जाण्याचीच वेळ. घरी अठराविश्वे दारिद्र्ये.

वैष्णव ढाकुलकर : स्पर्धा परीक्षा हेच ध्येयआर्णी : घरी भौतिक सुखसुविधांची ददात. शिकवणी लावायला पैसा नाही. प्रसंगी महाविद्यालयातही पायी जाण्याचीच वेळ. घरी अठराविश्वे दारिद्र्ये. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्याने बारावी उत्तीर्ण करणे कठीणच. पण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने याहूनही भयंकर परिस्थितीवर मात करीत ८२.३० टक्के गुण मिळविले आहेत. वैष्णव विलास ढाकुलकर असे या मेहनती विद्यार्थ्यांचे नाव आहे. आर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावरील काठोडा या छोट्याशा खेड्यात तो राहतो. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काठोडा येथून आर्णी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी तो पायी येत होता. शिक्षणासाठी पैसा लागणार म्हणून तो रोजमजुरी करायचा. वाणिज्य शाखेत शिकत असताना अभ्यासावर त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रित होते. वेळ मिळताच मजुरीचे काम करून तो शिक्षणासाठी पैसे जमवित होता. त्याचे वडील नागपूरला खासगी काम करतात. आई गावातील अंगणवाडीत काम करते. त्याचा त्रास पाहून काकाने त्याला सायकल घेऊन दिली. यापूर्वी दहावीतसुद्धा त्याने ८० टक्के गुण मिळविले होते. यापुढील शिक्षणही स्वत:च्या मेहनतीवरच घ्यायचे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनायचे, असे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. (शहर प्रतिनिधी)