शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

By admin | Updated: March 21, 2016 02:12 IST

आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र

यवतमाळ : आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. बँकेची वसुली नसल्याने ७१९ कोटी ७७ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरित करणे अशक्य असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत कर्ज वाटपासंदर्भात बँकर्स कमिटीची बैठक बुधवार १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकराी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामात १ हजार ७९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला देण्यात आले. यात सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी यंदा राष्ट्रीयकृत बँकांवर सोपविण्यात आली. त्या खालोखाल जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. यंदा ७१९ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु या बँकेने आत्ताच हात वर केले आहे. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे.जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. अशा स्थितीत गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी कर्जास पात्र ठरले होते. यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला बाद केले आहे. परिणामी कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्हा बँकेची कर्ज वसुली झाली नाही. कर्ज वसुली नसल्याने जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. गत वर्षी ११ हजार ३७८ शेतकऱ्यांनी ७० कोटी १५ लाख रुपयांची परतफेड केली. इतर शेतकरी कर्ज भरू शकले नाही. त्यामुळे आम्ही कर्ज वाटपास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्य बँक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त पैसा द्यायला तयार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचणी येत आहे. जिल्हा बँकेने पाठविलेल्या या पत्रावर विचार करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचे धोरण ठरणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा बँकांचे उंबरठे झिजवावे लागेल. (शहर वार्ताहर )४जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ७१९ कोटी ७७ लाखांऐवजी ३७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट करावे असे या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेनेच उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी केली तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना काय कर्ज देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन सभासदांना कर्ज मिळणार नाही४जुन्या सभासदांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. अशा स्थितीन नवीन सभासदांना कर्ज द्यायचे कोठून असा प्रश्न जिल्हा बँकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीही नवीन सभासदांना जिल्हा बँकेकडून एक छदामही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.