शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

By admin | Updated: March 21, 2016 02:12 IST

आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र

यवतमाळ : आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. बँकेची वसुली नसल्याने ७१९ कोटी ७७ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरित करणे अशक्य असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत कर्ज वाटपासंदर्भात बँकर्स कमिटीची बैठक बुधवार १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकराी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामात १ हजार ७९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला देण्यात आले. यात सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी यंदा राष्ट्रीयकृत बँकांवर सोपविण्यात आली. त्या खालोखाल जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. यंदा ७१९ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु या बँकेने आत्ताच हात वर केले आहे. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे.जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. अशा स्थितीत गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी कर्जास पात्र ठरले होते. यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला बाद केले आहे. परिणामी कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्हा बँकेची कर्ज वसुली झाली नाही. कर्ज वसुली नसल्याने जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. गत वर्षी ११ हजार ३७८ शेतकऱ्यांनी ७० कोटी १५ लाख रुपयांची परतफेड केली. इतर शेतकरी कर्ज भरू शकले नाही. त्यामुळे आम्ही कर्ज वाटपास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्य बँक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त पैसा द्यायला तयार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचणी येत आहे. जिल्हा बँकेने पाठविलेल्या या पत्रावर विचार करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचे धोरण ठरणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा बँकांचे उंबरठे झिजवावे लागेल. (शहर वार्ताहर )४जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ७१९ कोटी ७७ लाखांऐवजी ३७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट करावे असे या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेनेच उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी केली तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना काय कर्ज देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन सभासदांना कर्ज मिळणार नाही४जुन्या सभासदांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. अशा स्थितीन नवीन सभासदांना कर्ज द्यायचे कोठून असा प्रश्न जिल्हा बँकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीही नवीन सभासदांना जिल्हा बँकेकडून एक छदामही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.