शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

By admin | Updated: March 21, 2016 02:12 IST

आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र

यवतमाळ : आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. बँकेची वसुली नसल्याने ७१९ कोटी ७७ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरित करणे अशक्य असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत कर्ज वाटपासंदर्भात बँकर्स कमिटीची बैठक बुधवार १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकराी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामात १ हजार ७९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला देण्यात आले. यात सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी यंदा राष्ट्रीयकृत बँकांवर सोपविण्यात आली. त्या खालोखाल जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. यंदा ७१९ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु या बँकेने आत्ताच हात वर केले आहे. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे.जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. अशा स्थितीत गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी कर्जास पात्र ठरले होते. यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला बाद केले आहे. परिणामी कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्हा बँकेची कर्ज वसुली झाली नाही. कर्ज वसुली नसल्याने जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. गत वर्षी ११ हजार ३७८ शेतकऱ्यांनी ७० कोटी १५ लाख रुपयांची परतफेड केली. इतर शेतकरी कर्ज भरू शकले नाही. त्यामुळे आम्ही कर्ज वाटपास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्य बँक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त पैसा द्यायला तयार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचणी येत आहे. जिल्हा बँकेने पाठविलेल्या या पत्रावर विचार करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचे धोरण ठरणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा बँकांचे उंबरठे झिजवावे लागेल. (शहर वार्ताहर )४जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ७१९ कोटी ७७ लाखांऐवजी ३७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट करावे असे या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेनेच उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी केली तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना काय कर्ज देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन सभासदांना कर्ज मिळणार नाही४जुन्या सभासदांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. अशा स्थितीन नवीन सभासदांना कर्ज द्यायचे कोठून असा प्रश्न जिल्हा बँकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीही नवीन सभासदांना जिल्हा बँकेकडून एक छदामही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.