शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पोषण आहारात शिक्षक, कामगारांचे कुपोषण

By admin | Updated: January 3, 2017 02:14 IST

शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कामगार महिलांचे मानधन सध्या उदासीनतेच्या ‘पाईपलाईन’मध्ये

मानधन गेले कुठे : अधीक्षक म्हणतात टाकले, मुख्याध्यापक म्हणतात आलेच नाही यवतमाळ : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कामगार महिलांचे मानधन सध्या उदासीनतेच्या ‘पाईपलाईन’मध्ये अडकले आहे. अधीक्षक म्हणतात, आमच्याकडून नियमित मानधन आॅनलाईन टाकले जात आहे. तर मुख्याध्यापक म्हणतात, आम्हाला मिळालेच नाही. त्यामुळे पोषण आहार शिजविणाऱ्या जिल्ह्यातील ५ हजार कामगारांची कोंडी झाली आहे. तर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षकांच्याही नाकीनऊ येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, प्रत्येक शाळेत २६ विद्यार्थ्यांमागे आहार शिजविण्यासाठी एका कामगाराची नेमणूक करावी लागते. त्यांना मासिक एक हजार रुपये असे अत्यल्प मानधन दिले जात आहे. परंतु, हे मानधनही एप्रिल महिन्यापासून त्यांना मिळालेले नव्हते. अनेकदा आवाज उठविल्यावर सप्टेंबरपर्यंतचे पैसे कसेबसे मिळाले. मात्र नोव्हेंबरपासून पुन्हा मानधन अडकले आहे. पूर्वी जिल्हा परिषदेतून पंचायत समितपर्यंत आणि तेथून शाळांपर्यंत या पैशांचा प्रवास व्हायचा. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर विलंब होतो, असे सांगून प्रशासन वेळ मारून नेत होते. परंतु, आता जिल्हा पातळीवरून थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात हे मानधन जमा केले जाते. तरीही दोन-दोन महिन्याचे मानधन अडकत असल्याने पोषण आहार कामगारात संताप आहे. शिवाय, अनेक मुख्याध्यापक या कामगारांकडून चपराशीचीही कामे करवून घेतात. शाळा उघडणे, बंद करणे ही जबाबदारीही त्यांना दिली जाते. पैसे उशिरा मिळत असतानाही अशा कामांमुळे या महिला जेरीस आल्या आहेत. पोषण आहार अधीक्षक कराळे यांना विचारणा केली असता, आम्ही नियमित पैसे देत आहोत. येत्या एक-दोन दिवसात कामगारांचे पैसे त्यांना मिळतील, असे सांगितले. परंतु, पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर नागपुुरे यांनी सांगितले की, सीईओंना आम्ही अनेकदा सांगूनही कामगारांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. मासिक पाच हजार मानधनाची आमची मागणी आहे. पण सध्या असलेले एक हजारही वेळेवर मिळत नाही. आधी प्रत्येक कामगाराला स्वतंत्र बँक खाते काढून त्यात पैसे टाकणार असे सांगण्यात आले. आता मात्र त्यांचे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकले जातात. (स्थानिक प्रतिनिधी) केळी, बिस्कीट गायब ४पोषण आहारासोबतच विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा पूरक आहार द्यावा लागतो. त्यात अंडी, बिस्कीट, केळी दिली जातात. मात्र, जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचे पैसेच वेळेवर मिळत नाही. चालू शैक्षणिक सत्रात जुलैपासून आतापर्यंत एकदाही धान्यादी मालाचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे पोषण आहार कसाबसा उधारीवर भागविला जात आहे. मात्र ९० टक्के खासगी शाळांनी पूरक आहाराला दांडी मारली आहे. यात काही जिल्हा परिषद शाळांचाही समावेश आहे. वास्तविक पोषण आहाराची योजना अग्रीम रक्कम देऊन राबविण्याचे निर्देश आहेत. मात्र महिना संपल्यावरही निधी मिळत नसल्याने योजनेचे मातेरे होत आहे.