शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

पुसद तालुक्यात कोरोना विषाणू बळींची संख्या पोहोचली १५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

ठळक मुद्दे८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह । शनिवारी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ४५० बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ जणांचे बळी गेले आहे. शनिवारी नव्याने नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे.शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाचा समावेश आहे. याशिवाय शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बळीसंख्या १५ वर पोहोचली आहे. शनिवारी पॉथझटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका शिक्षकासह लोहार लाईनमधील सहा, द्वारकानगरीतील दोन आणि पार्वतीनगरमधील एकाचा समावेश आहे. तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या एकूण आता ४५० वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ३४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्याने ३५ जणांचे स्वॅब यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. संपूर्ण यंत्रणा रुग्णांवरील उपचार आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही पुरेशाप्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा कार्यरत आहे. आता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.गर्दीमुळे संसर्गाचा धोका कायमप्रशासनातर्फे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, टीएचओ डॉ.आशीष पवार, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुंकलवाड आदी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अनेक नागरिक विनाकारण विनामास्क घराबाहेर पडत आहे. गणेशचतुर्थीला बाजारात गर्दी दिसून आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या