शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात कोरोना विषाणू बळींची संख्या पोहोचली १५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

ठळक मुद्दे८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह । शनिवारी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ४५० बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ जणांचे बळी गेले आहे. शनिवारी नव्याने नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे.शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाचा समावेश आहे. याशिवाय शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बळीसंख्या १५ वर पोहोचली आहे. शनिवारी पॉथझटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका शिक्षकासह लोहार लाईनमधील सहा, द्वारकानगरीतील दोन आणि पार्वतीनगरमधील एकाचा समावेश आहे. तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या एकूण आता ४५० वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ३४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्याने ३५ जणांचे स्वॅब यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. संपूर्ण यंत्रणा रुग्णांवरील उपचार आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही पुरेशाप्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा कार्यरत आहे. आता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.गर्दीमुळे संसर्गाचा धोका कायमप्रशासनातर्फे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, टीएचओ डॉ.आशीष पवार, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुंकलवाड आदी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अनेक नागरिक विनाकारण विनामास्क घराबाहेर पडत आहे. गणेशचतुर्थीला बाजारात गर्दी दिसून आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या