शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

आता आधार चापडोहचा

By admin | Updated: April 19, 2016 06:04 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते तर चापडोह निम्माच असतो. या स्थितीत आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. यावर मात करण्यासाठी चापडोह प्रकल्पावर अतिरिक्त शुध्दीकरण केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. हे केंद्र अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जून अथवा जुलैमध्ये यवतमाळकरांच्या सेवेत येणार आहेत. तोपर्यंत यवतमाळकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चापडोह प्रकल्पाची क्षमता १३ दशलक्ष घनमीटर आहे. निळोणा प्रकल्पाची क्षमता ६.१९ दशलक्ष घनमीटरची आहे. निळोणाच्या तुलनेत चापडोह दुप्पट आहे. यामुळे या प्रकल्पात अधिक जलसाठा असतो. उपलब्ध पाणी वापरण्यासाठी शुध्दीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. योकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभारावे लागते. त्या ठिकाणी पाण्याच्या साठवणुकीसोबतच प्रक्रियेसाठी १८ तास लागतात. चापडोह प्रकल्पावर उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता एक कोटी ४५ लाख लिटरची आहे. असे असतानाही पाणी तुटवड्यामुळे या ठिकाणी २२ तास पंपिंग करून एक कोटी ६० लाख लिटर पाण्याचे शुध्दीकरण केले जाते. हे पाणी यवतमाळकरांच्या दृष्टीने अपुरे आहे. पाण्याचा साठा पाहता आणखी ५० लाख लिटर अतिरिक्त पाण्याचे शुध्दीकरण गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती गरजेची होती. यासाठी प्राधिकरणाने जलशुध्दीकरण केंद्राचे काम दोन वर्षांपासून हाती घेतले आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर निळोणा आणि चापडोह प्रकल्पात निर्माण होणारी पाण्याची विसंगती टळणार आहे. दोन अथवा तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याचा पेच सुटण्यास मदत होणार आहे. हा उन्हाळा यवतमाळकरांना जड जाणार असला तरी, पुढील वर्षीमात्र दिलासा मिळेल, अशी आशा आहे. (शहर वार्ताहर)निळोणावर चार वर्षांनंतर ‘इमर्जन्सी’४यवतमाळ : निळोणा जलाशयातील पाणी संपल्याने या ठिकाणी तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले. मंगळवारी या पंपाच्या मदतीने पाणी ओढण्याची चाचणी घेतली जाणार आहे. बुधवारपासून या क्षेत्रातून २२ तास पाणी उपसले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांचा पाणी प्रश्न सोडविला जाणार आहे. सन २०१२ मध्ये निळोणा प्रकल्पाने तळ गाठल्याने इमर्जन्सी पंप बसविण्यात आले होते. त्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यानंतर तब्बल चार वर्षाने निळोणा प्रकल्पात तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले आहे. डेडवॉटर शुध्द करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्या दृष्टीने जीवन प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. क्लोरीन आणि तुरटीचा उपयोग करून पाणी शुध्द केले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांना शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे.