शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आता आधार चापडोहचा

By admin | Updated: April 19, 2016 06:04 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते तर चापडोह निम्माच असतो. या स्थितीत आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. यावर मात करण्यासाठी चापडोह प्रकल्पावर अतिरिक्त शुध्दीकरण केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. हे केंद्र अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जून अथवा जुलैमध्ये यवतमाळकरांच्या सेवेत येणार आहेत. तोपर्यंत यवतमाळकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चापडोह प्रकल्पाची क्षमता १३ दशलक्ष घनमीटर आहे. निळोणा प्रकल्पाची क्षमता ६.१९ दशलक्ष घनमीटरची आहे. निळोणाच्या तुलनेत चापडोह दुप्पट आहे. यामुळे या प्रकल्पात अधिक जलसाठा असतो. उपलब्ध पाणी वापरण्यासाठी शुध्दीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. योकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभारावे लागते. त्या ठिकाणी पाण्याच्या साठवणुकीसोबतच प्रक्रियेसाठी १८ तास लागतात. चापडोह प्रकल्पावर उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता एक कोटी ४५ लाख लिटरची आहे. असे असतानाही पाणी तुटवड्यामुळे या ठिकाणी २२ तास पंपिंग करून एक कोटी ६० लाख लिटर पाण्याचे शुध्दीकरण केले जाते. हे पाणी यवतमाळकरांच्या दृष्टीने अपुरे आहे. पाण्याचा साठा पाहता आणखी ५० लाख लिटर अतिरिक्त पाण्याचे शुध्दीकरण गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती गरजेची होती. यासाठी प्राधिकरणाने जलशुध्दीकरण केंद्राचे काम दोन वर्षांपासून हाती घेतले आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर निळोणा आणि चापडोह प्रकल्पात निर्माण होणारी पाण्याची विसंगती टळणार आहे. दोन अथवा तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याचा पेच सुटण्यास मदत होणार आहे. हा उन्हाळा यवतमाळकरांना जड जाणार असला तरी, पुढील वर्षीमात्र दिलासा मिळेल, अशी आशा आहे. (शहर वार्ताहर)निळोणावर चार वर्षांनंतर ‘इमर्जन्सी’४यवतमाळ : निळोणा जलाशयातील पाणी संपल्याने या ठिकाणी तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले. मंगळवारी या पंपाच्या मदतीने पाणी ओढण्याची चाचणी घेतली जाणार आहे. बुधवारपासून या क्षेत्रातून २२ तास पाणी उपसले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांचा पाणी प्रश्न सोडविला जाणार आहे. सन २०१२ मध्ये निळोणा प्रकल्पाने तळ गाठल्याने इमर्जन्सी पंप बसविण्यात आले होते. त्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यानंतर तब्बल चार वर्षाने निळोणा प्रकल्पात तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले आहे. डेडवॉटर शुध्द करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्या दृष्टीने जीवन प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. क्लोरीन आणि तुरटीचा उपयोग करून पाणी शुध्द केले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांना शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे.