शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

आता दुकानांचे शटर दुपारीच होणार डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता  जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे वेळेत कपात : जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोेरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, त्यातही अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुकानांच्या या वेळा आणखी कमी करण्यात आल्या आहेत. आता ही दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता  जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत. दुकानांच्या वेळेबाबतचा हा नियम मोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमभंग होईल तेथेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हा आदेश १९ एप्रिलपासून १ मेच्या सकाळपर्यंत लागू राहणार आहे. संचारबंदी असूनही नागरिक अत्यावश्यक कामांच्या नावाखाली शहरात फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या दुकानांची वेळही कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या कमी केलेल्या कालावधीत वर्दळ व गर्दी टाळण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडण्याची गरज आहे.  

किराणा, भाजीपाला विक्रीवर मर्यादा संचारबंदीत किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळविक्री या सेवांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळेच ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. मात्र, आता सोमवारपासून या अत्यावश्यक दुकानांची वेळ दुपारी २ पर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. मात्र, दूध संकलन केंद्र, दुधाचे घरपोच वितरण तसेच हॉटेलमधून पुरविली जाणारी पार्सल सेवा यांच्यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ हीच वेळ कायम ठेवण्यात आली आहे.

या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील पेट्रोलपंप, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपालसेवा केंद्र, रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, वाहतूक व्यवस्था, पशुवैद्यकीय दवाखाने, त्यांच्या औषधांची दुकाने आदी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ ही वेळेची मर्यादा या सेवांना लागू नाही.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार