शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

आता अपंगांच्या विशेष शाळांचा दर्जा सुधारणार

By admin | Updated: October 3, 2015 02:24 IST

अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे.

 समिती स्थापन : विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण व आरोग्य यवतमाळ : अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काही विशेष बाबींचे निर्धारण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अशा शाळांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेत सर्व सबंधितांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपंगांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाली. अपंगांच्या शाळांचा दर्जा सुधारून त्या सुस्थितीत चालविण्याबाबत संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. अपंग क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कार्य केल्याबाबत राज्य किंवा केंद्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त केलेल्या चार व्यक्त सदस्य राहतील. पालक संघटनेचे प्रतिनिधी प्रत्येक प्रवर्गातून एक व्यक्त सदस्य असेल. नामांकीत विशेष शाळांचे अध्यक्ष किंवा सचिव (प्रत्येक प्रवर्गातून एक) सदस्य असेल, प्रत्येक जिल्ह्यातील अपंगांच्या चारही प्रवर्गातून प्रत्येकी एक याप्रमाणे अपंग शाळेत असणाऱ्या व योग्यता असलेली व्यक्ती ही देखील सदस्य राहील. याशिवाय जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव असतील. याप्रमाणे ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांचा दर्जा सध्या कमालीचा खालावला आहे. बोटावर मोजण्याइतपतच संस्था योग्यरित्या आणि शासनाच्या निकषांप्रमाणे अपंगांसाठीच्या शाळा चालवित आहे. इतरत्र मात्र सर्वत्र सावळा-गोंळध आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासल्या जात आहे. अपंगांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीकोणातून ह्या शाळा चालविल्या जाणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी अपंगांना शिक्षणासोबतच भावनिक आधार आणि उपचार मिळणेही गरजेचे आहे. परंतु बहुतांश शाळांमध्ये या आवश्यक बाबींची वाणवा दिसून येते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून अपंगांचा निश्चितच विकास घडून येईल, अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही. (प्रतिनिधी)