शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

आता दलित साहित्यालाच नोबेल पुरस्कार

By admin | Updated: February 28, 2017 01:23 IST

भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे.

लोकनाथ यशवंत : तळागाळातील माणसाचा विचार करणारे साहित्य यवतमाळ : भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे. जुन्या रुढी आणि परंपरात अडकलेले हिंदुस्थानी साहित्य भ्रमीत करणारे असल्याने गलितगात्र असणाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दलित साहित्यच दर्जेदार साहित्य असल्याने यानंतर नोबेल पुरस्कार मिळाला तर तो दलित साहित्यालाच मिळेल, असे मत प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. सातव्य आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येथे आले असता ते प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, काव्य हा परिपूर्ण प्रकार असून छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्यामुळे शक्य होते. फॅशन प्रमाणे काव्यातही बदल होत असतात. यातून नक्कल निघून जाते आणि शेवटी दर्जेदार काव्यच काळाची ओघात टिकून राहते. काव्य गेय आहे की मुक्त छंदात आहे या पेक्षा त्याचा दर्जा महत्वाचा ठरतो. कविता वाचल्या बरोबर त्या कवितेत कवीची छाप दिसली पाहिजे, जेणे करुन कवितेच्या खाली कवीला आपले नावसुद्धा लिहिण्याची गरज पडणार नाही. कवी लोकनाथ यशवंत यांचा ‘बाकी सर्व ठिक आहे’ हा काव्य संग्रह एवढ्यातच प्रकाशित झाला आहे. कवीते व्यतिरिक्त आपण कोणत्याही साहित्य प्रकाराकडे वळलो नसल्याचे त्यांनी मान्य केले. आपली प्रकृती आणि प्रवृत्ती काव्यासाठीच पोषक आहे, असे ते म्हणाले. यवतमाळचे प्रसिद्ध कवी एजाज जोश यांच्या ‘जेरबंद’ या काव्य संग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. याशिवाय निदा फजलींच्या ‘माणूस बेजार इथे आणि तिथे’ या काव्य संग्रहाचा आणि ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘शब्द कभी झुट नही बोलते’ या काव्य संग्रहाचा मराठी अनुवाद केला आहे. अनेकदा माझ्या कवितांवरही आक्षेप घेतले जातात. त्यात नावीन्य नाही, असे आरोप होतात. परंतु मी त्याची पर्वा करीत नाही. आपल्या पद्धतीने जीवन जगताना जे चांगले आहे, त्याच्या मागे जाण्याचा माझा स्वभाव आहे. लहान मुल जसे स्वत:च्या इच्छेप्रमाणे हसते-बागडते, आपल्या पद्धतीने जीवन जगते तसे मुल मी माझ्या मनात जीवंत ठेवले आहे. जिलेबी सारख्या भारतीय साहित्यात माझे मन रमत नाही. यापुढेही मी फक्त स्वत:च्या शैलीतच दर्जेदार काव्य निर्मिती करीत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)