शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

आता दलित साहित्यालाच नोबेल पुरस्कार

By admin | Updated: February 28, 2017 01:23 IST

भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे.

लोकनाथ यशवंत : तळागाळातील माणसाचा विचार करणारे साहित्य यवतमाळ : भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे. जुन्या रुढी आणि परंपरात अडकलेले हिंदुस्थानी साहित्य भ्रमीत करणारे असल्याने गलितगात्र असणाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दलित साहित्यच दर्जेदार साहित्य असल्याने यानंतर नोबेल पुरस्कार मिळाला तर तो दलित साहित्यालाच मिळेल, असे मत प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. सातव्य आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येथे आले असता ते प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, काव्य हा परिपूर्ण प्रकार असून छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्यामुळे शक्य होते. फॅशन प्रमाणे काव्यातही बदल होत असतात. यातून नक्कल निघून जाते आणि शेवटी दर्जेदार काव्यच काळाची ओघात टिकून राहते. काव्य गेय आहे की मुक्त छंदात आहे या पेक्षा त्याचा दर्जा महत्वाचा ठरतो. कविता वाचल्या बरोबर त्या कवितेत कवीची छाप दिसली पाहिजे, जेणे करुन कवितेच्या खाली कवीला आपले नावसुद्धा लिहिण्याची गरज पडणार नाही. कवी लोकनाथ यशवंत यांचा ‘बाकी सर्व ठिक आहे’ हा काव्य संग्रह एवढ्यातच प्रकाशित झाला आहे. कवीते व्यतिरिक्त आपण कोणत्याही साहित्य प्रकाराकडे वळलो नसल्याचे त्यांनी मान्य केले. आपली प्रकृती आणि प्रवृत्ती काव्यासाठीच पोषक आहे, असे ते म्हणाले. यवतमाळचे प्रसिद्ध कवी एजाज जोश यांच्या ‘जेरबंद’ या काव्य संग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. याशिवाय निदा फजलींच्या ‘माणूस बेजार इथे आणि तिथे’ या काव्य संग्रहाचा आणि ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘शब्द कभी झुट नही बोलते’ या काव्य संग्रहाचा मराठी अनुवाद केला आहे. अनेकदा माझ्या कवितांवरही आक्षेप घेतले जातात. त्यात नावीन्य नाही, असे आरोप होतात. परंतु मी त्याची पर्वा करीत नाही. आपल्या पद्धतीने जीवन जगताना जे चांगले आहे, त्याच्या मागे जाण्याचा माझा स्वभाव आहे. लहान मुल जसे स्वत:च्या इच्छेप्रमाणे हसते-बागडते, आपल्या पद्धतीने जीवन जगते तसे मुल मी माझ्या मनात जीवंत ठेवले आहे. जिलेबी सारख्या भारतीय साहित्यात माझे मन रमत नाही. यापुढेही मी फक्त स्वत:च्या शैलीतच दर्जेदार काव्य निर्मिती करीत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)