शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

आता होईल गावागावांत आधार नोंदणी

By admin | Updated: May 9, 2016 02:24 IST

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

वंचितांना दिलासा : तहसील कार्यालयातही केंद्र सुरूचसुहास सुपासे यवतमाळगेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आता त्यासोबतच ग्रामीण भागात गावागावात आधार नोंदणी करण्यात येणार आहे. अद्यापही जे नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत, अशा नागरिकांसाठी ही मोहीम महसूल प्रशासनाकडून राबविण्यात ये आहे. प्रत्येक गावात आधार कार्ड मोहीम राबविली जाणार असल्यामुळे अद्यापही जे नागरिक काही कारणास्तव तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत, अशांसह आजारी, अपंग, वृद्ध असे सर्व नागरिक आपल्या गावातच आधार नोंदणी करू शकतील. साधारणत: एक वर्षापूर्वी जिल्ह्यात ३५ ते ४० टक्के नागरिक आधार कार्डापासून वंचित होते. याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड केंद्रच उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांना आधार केंद्रासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु गेल्या सहा महिन्यात जिल्हा प्रशासनाने यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. सुरूवातीला जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा-अंगणवाड्या यामध्ये कव्हर केल्या. एकही विद्यार्थी आधार मोहिमेतून सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड केंद्र सुरू केले. याचाच परिणाम म्हणून सध्या ८० टक्क्याहून अधिक नागरिक आधारच्या कक्षेत आले आहेत. परंतु अद्यापही १५ ते २० टक्के नागरिक आधारकार्ड शिवाय आहेत. यामध्ये बहुतांश नागरिक ग्रामीण भागातील आहेत. ही बाब हेरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गावागावात जाऊन आधार कार्ड काढणे सध्या सुरू आहे. छोट्या गावांमध्ये एक दिवस तर मोठ्या गावांमध्ये लोकसंख्येचा अंदाज घेऊन दोन किंवा तीन दिवसही रोटेशननुसार हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ही जबाबदारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मध्यंतरी तलाठ्यांच्या संपामुळे या कामाला खिळ बसली होती. परंतु आता पुन्हा गती आली आहे. यवतमाळ तालुक्यात २० मशिन्स दोन मंडळ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. म्हणजे एका दिवसात साधारणत: २० गावे होणार आहेत. मोठ्या गावांमध्ये रोटेशननुसार पुन:पुन्हा ही मोहीम राबविण्यात येईल. सबंधित नागरिकांनी आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधल्यास त्यांना त्यांच्या गावातील आधार कार्ड शिबिराचा दिवस कळू शकेल. तसेच संबंधित तहसीलमधूनही याबाबत माहिती मिळू शकेल. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.