यवतमाळ : ग्रामीण भागातील माता व बालकांमध्ये जागृती करण्याचा एकमेव दुआ म्हणून अंगणवाडी कार्यरत आहे. या दोन घटकांशी निगडीत सर्वच उपक्रम येथून राबविण्यात येतात. त्यामुळेच अंगणवाडीच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांना आयएसओ मानांकन देण्यात येणार आहे. औरंगाबद जिल्हा परिषदेने अंगवाडीची स्थिती सुधारणे आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेतली. पाटोदा येथील अंगणवाडीने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच या अंगणवाडीला अयाएसओ मानांकन मिळाले आहे. या प्रमाणेच जिल्ह्यातील अंगणवाडींचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक अंगणवाडीेच्या कामकाजाचे मूल्यांकन करून त्यांना आयएसओचा दर्जा दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सर्व गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. मुख्यसेविकांनी प्रत्येकी दहा गावे दत्तक घेवून वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याच्या सुचना सीईओंनी दिल्या. याशिवाय अंगणवाडी सेविकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेलाच काढण्याचे निर्देश दिले. यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून बालकांना सकस आहार आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आता अंगणवाडीलाही आयएसओ मानांकन
By admin | Updated: May 24, 2014 00:12 IST