शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

गोवंश हत्याप्रकरणात आता कारावास

By admin | Updated: September 21, 2015 02:29 IST

गाय, वळू किंवा बैल यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले असून उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची सजा आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

पाच वर्षांची शिक्षा : महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ मध्ये अमृूलाग्र सुधारणा राजाभाऊ बेदरकर उमरखेड गाय, वळू किंवा बैल यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले असून उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची सजा आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ मध्ये अमुलाग्र सुधारणा करण्यात आली असून यातून गोवंश हत्येला आळा बसणार आहे.भारताचे राष्ट्रपतींनी या तरतुदींना २६ फेब्रुवारी २०१५ ला संमती दिली असून महाराष्ट्र विधानमंडळाने नवीन प्राणी रक्षण कायद्यात त्याचे रुपांतर केले आहे. या कायद्यान्वये जर कुणी कत्तल करण्याच्या उद्देशाने गाय, वळू किंवा बैल यांची वाहतूक करीत असेल तर त्याच्यावर उपनिरीक्षकाच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत अशी प्राणी वाहतूक करणाऱ्याला अडविण्याचा, त्यात प्रवेश करून तपासणी करण्याचा अधिकार या कायद्यान्वये बहाल करण्यात आला आहे. यापूर्वीच्या ‘गाईची कत्तल करण्यास मनाई’ या अधिनियमात बदल करून ‘दुधासाठी, पैदाशीसाठी किंवा ओझी वाहनाच्या कामासाठी गार्इंची, वळूंची किंवा बैलांची कत्तल करण्यास मनाई अशी सुधारणा नवीन अधिनियमात करण्यात आली आहे.या अधिनियमामध्ये आता अशी जनावरे परप्रांतात वाहून नेऊन त्यांची कत्तल करणे, कत्तल केलेल्या प्राण्यांचे मांस विकणे किंवा अशा प्राण्यांचा साठा करणे यावर निर्बंध घातले आहे. यात पुढे असेही म्हटले आहे की या धंद्यात गुंतलेले मालक, त्यांचे एजंट किंवा त्यांच्या नोकरामार्फत उल्लंघन झाल्यास त्यांना देखील दोषी ठरवून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५ ब नुसार गाय, वळू किंवा बैल यांची कत्तल करण्यासाठी खरेदी केली जात आहे, याची माहिती असूनही हेतुपुरस्सर अशी खरेदी-विक्री करणाऱ्यांवरही प्रतिबंध घातले आहे. तसे आढळल्यास त्यांंनाही दोषी ठरवून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वीच्या महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ मध्ये विशेष सुधारणा करण्यात आल्यामुळे आता गोवंश हत्येला लगाम लागणार आहे. यामुळे या व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.