शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेसची आता जिल्हाभर रथयात्रा

By admin | Updated: December 23, 2016 02:04 IST

सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी

बैठक : निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती यवतमाळ : सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी आता जिल्हाभर रथयात्रा काढण्याचा निर्णय नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही काँग्रेस करणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक बुधवारी शासकीय विश्रामभवनात पार पडली. उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, विधान परिषद, नगरपरिषदा अशा पाठोपाठ निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची गरज आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण करता यावे या दृष्टीने काँग्रेसने वणीपासून उमरखेडपर्यंत सर्व १६ ही तालुक्यात रथयात्रा काढण्याचे ठरविले आहे. आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता वेळ कमी असल्याने या रथयात्रेबाबत तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी नेते-पदाधिकाऱ्यांची पुन्हा लगेच बैठक घेतली जाणार आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. जनतेतील नाराजी कॅश करण्याच्या दृष्टीने आणि काँग्रेस पक्षाबाबत जनतेत पुन्हा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने रथयात्रा उपयोगी ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला गेला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करून मतदारांना वास्तव पटवून देण्याचा व त्या माध्यमातून काँग्रेसचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न नेते-पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे. या बैठकीमध्ये लहान पक्षांसोबत आघाडी करण्याच्या दृष्टीनेही प्राथमिक चर्चा झाली. मात्र या संबंधिचे अधिकार पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवर देतात की नाही याबाबतची साशंकता पदाधिकाऱ्यांमध्ये पहायला मिळाली. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा काँग्रेसला सेनापतीच मिळेना ! शतकोत्तरी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला यवतमाळ जिल्ह्यात नवा जिल्हाध्यक्ष मिळेनासा झाला आहे. म्हणायला अनेक नावे पुढे येत असली तरी त्यावर नेत्यांमध्ये कुणाबाबतही एकमत होताना दिसत नाही. काँग्रेस कमिटीने पॅनलवर दोन नावे पाठविली असली तरी त्याबाबतही काहींची नाराजी आहे. सेनापतीच नसताना काँग्रेसच्या जिल्हाभरातील सैनिकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवायच्या कशा हा प्रश्न आहे.