शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नाफेड, व्हीसीएमएसला नोटीस

By admin | Updated: March 27, 2017 01:16 IST

बनावट टोकनच्या माध्यमातून तूर खरेदी झाल्याप्रकरणी बाजार समितीने नाफेड व व्हीसीएमएसला नोटीस बजावली.

बनावट टोकनवर तूर खरेदी : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापाऱ्यांच्या तुरीरूपेश उत्तरवार यवतमाळबनावट टोकनच्या माध्यमातून तूर खरेदी झाल्याप्रकरणी बाजार समितीने नाफेड व व्हीसीएमएसला नोटीस बजावली. यामुळे उतारा कमी येऊनही जादा तूर कशी खरेदी झाली, याचा आता भंडाफोड होणार आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तुरीचा प्रती हेक्टरी ९ क्विंटल उतारा आला. प्रत्यक्षात शासकीय खरेदीचा अहवाल वेगळाच आहे. यवतमाळात २५० टोकनवर ३० हजार क्विंटल तूर खरेदी झाली. खरेदीची आकडेवारी व एकूण टोकनचा हिशेब काढल्यास एका टोकनवर सरासरी १२५ क्विंटल तूर खरेदी झाल्याचे यावरून दिसून येते. शेतकऱ्यांना एवढे विक्रमी उत्पादन झाले नसताना ही तूर कुठून आली, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भलत्यांनीच तूर विकल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. बाजार समितीने याप्रकरणी संबंधित कर्मचारी आणि नाफेडला नोटीस बजावली आहे. आता चौकशीनंतरच टोकनचे घबाड उघड होणार आहे.येथील बाजार समितीमध्ये टोकन वितरणात हेराफेरी झाल्याची बाब उघड झाली. काही टोकन बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक आणि उपसभापती गजानन डोमाळे यांनी पकडले. यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचा गैरवापर होऊन व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकल्याचे उघड झाले. यात नेमके कोणते व्यापारी, बाजार समिती व नाफेडचे कोणते कर्मचारी गुंतले आहेत, याची माहिती अद्याप पुढे आली नाही. याची चौकशी करण्यासाठी बाजार समितीने चौकशी समिती नेमली. त्यांनी तुरीच्या ढिगाचा पंचनामा केल्यानंतर तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच नाफेडचे ग्रेडर आणि व्हीसीएमएसच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी हिताची योजना व्यापाऱ्यांनी कशी लाटली? हा प्रश्न मात्र अद्याप कायमच आहे. व्यापाऱ्यांची तूर बाजार समितीत का?व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल तत्काळ उचलून न्यायचा असतो. मात्र महिन्यापासून हा शेतमाल उचललाच गेला नाही. बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा शेतमाल राहिला. आता भर उन्हात शेतकऱ्यांना तापावे लागत आहे. याच ठिकाणी त्यांच्या शेतमालाचा हर्रास होत आहे. विशेष म्हणजे, खरेदी झालेली व्यापाऱ्यांची तूरही तेथेच आहे. यामुळे संशय आणखीच बळावला आहे.२४ तासांचा अल्टीमेटमबाजार समितीने शेडमधील थप्प्यांची पाहणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे पोते आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात संचालक मंडळाने पाहणी केली, तेव्हा हे पोते व्यापाऱ्यांचेच असल्याचे उघड झाले. या प्रकारात व्यापाऱ्यांना २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. याकाळात पोते न उचलल्यास बाजार समिती पोते जप्त करून त्याचा स्वत: लिलाव करणार आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी शेतमाल विकला. यापुढे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सातबारा देऊ नये आणि अशा व्यापाऱ्यांचे पोते असतील, तर बाजार समितीला सांगावे, असे सभापती रवींद्र ढोक आणि उपसभापती गजानन डोमाळे यांनी सांगितले.