शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

तांडा वस्तीच्या अशासकीय अध्यक्षांना कायमचा डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:06 IST

जिल्हास्तरीय अशासकीय समितीकडून ‘टक्केवारी’चा खेळ होत असल्याने तांडे ‘जैसे थे’ राहिले. त्यामुळे शासनाने आता या अशासकीय समित्याच बरखास्त केल्या आहेत. योजनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून कामांना मंजुरी देण्याचे अधिकार थेट राज्यस्तरावर ठेवण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकमिशनखोरीला चापकामांच्या मंजुरीचे अधिकार राज्यस्तरावरनिधीही दुप्पट वाढविला

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तांड्यात राहणाऱ्या भटक्या विमुक्तांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यात ‘तांडा वस्ती सुधार योजना’ राबविली जाते. परंतु, जिल्हास्तरीय अशासकीय समितीकडून ‘टक्केवारी’चा खेळ होत असल्याने तांडे ‘जैसे थे’ राहिले. त्यामुळे शासनाने आता या अशासकीय समित्याच बरखास्त केल्या आहेत. योजनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून कामांना मंजुरी देण्याचे अधिकार थेट राज्यस्तरावर ठेवण्यात आले आहेत.तांडा वस्ती सुधार योजनेतून तांड्यांना अल्प निधी मिळत होता. जिल्हास्तरीय अशासकीय समितीच्या माध्यमातून संबंधित तांड्यात कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी खर्च केला जात होता. परंतु, यात अशासकीय समितीकडून कमिशनखोरीचा प्रकार बोकाळला होता. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांपासून ही समिती अस्तित्वातच नाही. त्याऐवजी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली या योजनेची कामे सुरू होती. कधी ना कधी या समितीवर काम करण्याची आस अनेक जण बाळगून होते. परंतु, आता शासनाने ही समितीच बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती केली आहे.यासंदर्भात विमुक्त जाती जमाती कल्याण विभागाने मंगळवारी आदेश जारी केला आहे. त्यानुसार, समाज कल्याणच्या सहायक आयुक्तांकडून पाठविण्यात आलेले अशासकीय पदाधिकारी नेमणुकीचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. तसेच योजनेच्या निधीतही वाढ करण्यात आली आहे. १०० लोकसंख्येच्या तांड्यासाठी दोन लाखांऐवजी चार लाख, दीडशेपर्यंत लोकसंख्या असलेल्या तांड्यासाठी तीनऐवजी सहा लाख आणि दीडशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांड्यासाठी पाचऐवजी १० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या निधीतून रस्ते, पाणी, गटारी, विद्युतीकरण, समाजमंदिर अशी कोणतीही कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मदतीने करण्यात येतील. कामाची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला राहणार आहेत. या समितीमध्ये जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी हे सदस्य असतील. तर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य सचिव असतील. समितीने मान्य केलेले प्रस्तावच पुण्याच्या संचालनालयामार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.

कार्यकर्त्यांची निराशावसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अशासकीय समितीवर अध्यक्ष म्हणून राजकीय कार्यकर्त्यांचीच वर्णी लागत आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून समितीवर नेमणुकाच झाल्या नाही. आता सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या ‘वंचित’ कार्यकर्त्यांना समितीवर वर्णी लागण्याची अपेक्षा होती. मात्र, समितीच बरखास्त केल्याने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

अभियानाच्या माध्यमातून सरकारकडे योजनेत सुधारणा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. नागपूर अधिवेशनात अभियानाचा आवाज बनून पाच आमदारांनी मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, तांड्याच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने स्वतंत्रपणे अभ्यास समिती नेमण्याची गरज आहे.- एकनाथ पवार, प्रवर्तक, तांडे सामू चालो अभियान

टॅग्स :Governmentसरकार