शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तंटामुक्त समित्या नामधारी

By admin | Updated: August 17, 2016 01:15 IST

गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे.

तक्रारींचे प्रमाण वाढले : पोलीस आणि तालुका प्रशासनाचा असहकार नेर : गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे. मात्र बहुतांश गावातील या समित्या नामधारी आहे. समितीने बोलाविलेल्या बैठकांना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहात नाही. विशेष म्हणजे, पोलीस विभागाचाही प्रचंड असहकार सुरू आहे. स्थानिक नागरिकांचा समावेश या समित्यांमध्ये करण्यात आला आहे. गावातील तंटे पोलिसांपर्यंत जावू नये, आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने या समित्यांनी काम करणे अपेक्षित होते. परंतु समित्यांसह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यासाठी कुठलेही योगदान नसल्याचे दिसून येते. एखाद्या गावात निर्माण झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांचे मत विचारात घेणे अपेक्षित आहे. परंतु तसे केले जात नाही. दुसरीकडे समित्यांमधील सदस्यांनाही यामध्ये तेवढा रस नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, शिक्षक, आरोग्य, महसूल याशिवाय प्रामुख्याने पोलीस विभागाचे सहकार्य आवश्यक त्या प्रमाणात मिळत नाही. परिणामी गावात निर्माण होणारे तंटे थेट पोलिसांपर्यंत जात आहे. समितीवर पोलीस पाटलांचे नियंत्रण असते. त्यांच्या अनुपस्थितीत तलाठी किंवा ग्रामसेवकांनी भूमिका पार पाडावी, असे शासनाचे निर्देश आहे. पण यातील कुठलाही अधिकारी सभेला हजर राहात नाही. त्यामुळे समित्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. समित्यांमध्ये काही ठिकाणी राजकीय लोकांचा हस्तक्षेप होत आहे. त्यांच्या मर्जीतील व्यक्ती समितीत घेतला नाही तर गठित समितीला त्यांच्याकडून सहकार्य लाभत नाही. सभांकडे ते पाठ फिरवितात, असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. त्यामुळे या समित्यांचे कार्य प्रभावीपणे होत नसल्याचाही सूर आहे. पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी वाढत चालल्या आहे. थेट कारवाई करण्यापूर्वी या समित्यांना विश्वासात घेणे अपेक्षित आहे. परंतु पोलिसांकडूनही मार्गदर्शन केले जात नसल्याचे सांगितले जाते. समित्या सक्षम व्हाव्या, यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)