शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

तंटामुक्त समित्या नामधारी

By admin | Updated: August 17, 2016 01:15 IST

गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे.

तक्रारींचे प्रमाण वाढले : पोलीस आणि तालुका प्रशासनाचा असहकार नेर : गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे. मात्र बहुतांश गावातील या समित्या नामधारी आहे. समितीने बोलाविलेल्या बैठकांना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहात नाही. विशेष म्हणजे, पोलीस विभागाचाही प्रचंड असहकार सुरू आहे. स्थानिक नागरिकांचा समावेश या समित्यांमध्ये करण्यात आला आहे. गावातील तंटे पोलिसांपर्यंत जावू नये, आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने या समित्यांनी काम करणे अपेक्षित होते. परंतु समित्यांसह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यासाठी कुठलेही योगदान नसल्याचे दिसून येते. एखाद्या गावात निर्माण झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांचे मत विचारात घेणे अपेक्षित आहे. परंतु तसे केले जात नाही. दुसरीकडे समित्यांमधील सदस्यांनाही यामध्ये तेवढा रस नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, शिक्षक, आरोग्य, महसूल याशिवाय प्रामुख्याने पोलीस विभागाचे सहकार्य आवश्यक त्या प्रमाणात मिळत नाही. परिणामी गावात निर्माण होणारे तंटे थेट पोलिसांपर्यंत जात आहे. समितीवर पोलीस पाटलांचे नियंत्रण असते. त्यांच्या अनुपस्थितीत तलाठी किंवा ग्रामसेवकांनी भूमिका पार पाडावी, असे शासनाचे निर्देश आहे. पण यातील कुठलाही अधिकारी सभेला हजर राहात नाही. त्यामुळे समित्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. समित्यांमध्ये काही ठिकाणी राजकीय लोकांचा हस्तक्षेप होत आहे. त्यांच्या मर्जीतील व्यक्ती समितीत घेतला नाही तर गठित समितीला त्यांच्याकडून सहकार्य लाभत नाही. सभांकडे ते पाठ फिरवितात, असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. त्यामुळे या समित्यांचे कार्य प्रभावीपणे होत नसल्याचाही सूर आहे. पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी वाढत चालल्या आहे. थेट कारवाई करण्यापूर्वी या समित्यांना विश्वासात घेणे अपेक्षित आहे. परंतु पोलिसांकडूनही मार्गदर्शन केले जात नसल्याचे सांगितले जाते. समित्या सक्षम व्हाव्या, यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)