शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत.

ठळक मुद्देयवतमाळातील स्थिती; शहराची सुरुवातच कोलाम पोडापासून, दुर्गम भागात पालिका पोहोचलीच नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, भोसा, उमरसरा या ग्रामीण भागातील नव्या वसाहतींमध्ये ना धड रस्ते व वीज पुरवठा आहे. आता कुठे नव्या वसाहतीत नळाची पाईपलाईन टाकली जात आहे. नळ कधी येतील याचा पत्ता नाही. या नव्या वसाहतींमध्ये विकास कामांसाठी निधीची चणचण असल्याने नागरिकांना अगदीच प्राथमिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने रस्त्यावरच गटार तयार झाले आहेत. माेठमोठ्या निवासी संकुलाचे सांडपाणी रस्त्यावरून जात आहे. अशा एक ना अनेक समस्या नगरपरिषदेत आहे. यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत. त्यावरच ती मंडळी समाधान मानत आहे. अशीच स्थिती लोहारा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, भोसा, उमरसरा येथे नव्याने उदयास आलेल्या ले-आऊटमध्ये आहे. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ताच नसतो, तर पिण्याकरिता पाणी नसल्याने पायपीट करावी लागते. वीज पुरवठाही वारंवार खंडित होतो. बऱ्याच भागात पथदिवेही नाहीत.

रस्ता, वीज, पाण्याच्या समस्या कायमचशहरात समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायतींमध्ये नवीन ले-आऊट तयार झाले. आता तेथे नागरीकरण होत आहे. याठिकाणी रस्ते, नाल्या, वीज पुरवठ्याचे खांब उपलब्ध नाहीत. नगरपरिषदेचा विस्तार करताना आजूबाजूच्या सर्व घाटापर्यंतच्या सीमा पालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. २०१६ मध्ये विस्तारलेल्या नगरपालिकेला या भागांमध्ये कुठलीच विकास कामे पोहोचविता आली नाही. आजही एखाद्या डोंगरदऱ्यात वसलेल्या आडवळणावरील वस्तीसारखी स्थिती येथील नागरिकांची आहे. नावालाच नगरपरिषद क्षेत्र असून ग्रामीण भागापेक्षाही समस्या गंभीर आहे. विकास शुल्क न भरताच ले-आऊट तयार झाल्याने आता त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे.

उकंडा पोडावर आतापर्यंत रस्ते, पाणी, वीज नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांत स्थानिक नगरसेवक विजय खडसे यांच्या पाठपुराव्याने ही कामे सुरू झाली आहेत. आमच्या येथे सर्व शेतकरी, शेतमजूर राहतात. शहरात आहोत हे आम्हाला अजूनही वाटत नाही. मेहनतीची कामे करून पोट भरणे हिच दिनचर्या आहे. घरकूल व इतर याेजना आलेल्या नाहीत. - दशरथ देवकर, उकंडा पोड

वडगावमध्ये येत असलेल्या इंद्रायणीनगर येथे अजूनही रस्ते, नाल्या, विजेचे खांब, नळ योजना पोहोचलेली नाही. एखाद्या दुर्गम भागात राहावे, अशी स्थिती आहे. पालिकेकडून कोणतीच सुविधा येथे दिली जात नाही. याठिकाणी घंटागाडी तर सोडाच सांडपाण्याच्या नाल्याही नाहीत. पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.  - अरुणा राऊत, इंद्रायणीनगर, वडगाव

शहराच्या विस्तारानंतर बराच मोठा भाग नगरपालिकेत जोडला गेला आहे. नव्या ले-आऊटमध्ये मुलभूत सोयीसुविधांची कामे होणे बाकी आहे. त्यासाठी नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे. निधीची उपलब्धता होताच या भागातही सुविधा देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावरही पाठपुरावा सुरू आहे.-ममता राठोड, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ

या वसाहती बनल्या समस्यांचे माहेरघर

२०१६ मध्ये सात ग्रामपंचायती शहरात विलीन झाल्या. या भागातील विकास कामे तेव्हापासून ठप्प आहे. लोहारा, वाघापूर, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, भोसा येथील अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सोयीसुविधाही पोहोचलेल्या नाहीत.

समस्या काय आहेत?

दुर्गम भागात असलेल्या वस्त्यांमध्ये नगरपरिषदेची कोणतीच यंत्रणा पोहोचत नाही. प्रभाग क्र.१ मध्ये येत असलेल्या उकंडा पोड, लोखंडबर्डी, जामडोह पोड, करकडोह पोड, मासोळी पोड येथे स्थानिक नगरसेवकाशिवाय कोणीच प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. आदिवासी बहुल असलेला हा दुर्गम भाग कायम उपेक्षित राहिला आहे. काही ठिकाणी आता कुठे रस्ते होत आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा