शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ना तार्इंचे, ना भाऊंचे, आम्ही फक्त साहेबांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST

जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उफाळून आल्यानंतर नेमके कुणाच्या मागे उभे रहावे, असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांची रोखठोक भूमिका : गटबाजीवर खंतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उफाळून आल्यानंतर नेमके कुणाच्या मागे उभे रहावे, असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. निष्ठावंत शिवसैनिक मात्र ‘ना आम्ही भाऊंचे, ना तार्इंचे, आम्ही फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे’ अशी रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत. जिल्हा शिवसेनेतील नेत्यांमधील भांडणे ‘मातोश्री’पर्यंत पोहोचली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे दोनही नेत्यांनी युक्तीवाद केल्यानंतरही वाद मिटत नसल्याचे पाहून अखेर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना यवतमाळ-वाशिम जिल्ह्यात पाठविण्याचा निर्णय ‘मातोश्री’वरून घेण्यात आला आहे. आता रामदास कदम यांच्या अहवालानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सेना नेत्यांच्या दोनही गटांनी अधिकाधिक संख्याबळ जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही शिवसैनिक छातीठोकपणे आपण कोणत्या गटासोबत आहोत हे सांगत आहे. तर दोनही तबले वाजविणाऱ्या शिवसैनिकांना मात्र आता उघडे पडण्याची भीती वाटू लागली आहे. नेमके कुणाच्या गटात जावे, याचा संभ्रम त्यांच्यात पहायला मिळतो. त्याचवेळी निष्ठावंत शिवसैनिकांनी मात्र रोखठोक भूमिका मांडली आहे. या शिवसैनिकांच्या मतानुसार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेसुद्धा आमचे नेते आहेत आणि खासदार भावनाताई गवळी यासुद्धा आमच्या नेत्या आहेत. आम्हाला हे दोनही नेते सारखेच आहेत. आम्ही यापैकी कोणत्याच गटाचे नाहीत. आम्ही केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सैनिक आहोत. स्वाक्षरी मोहीम राबविल्यास आम्ही या दोनही नेत्यांना स्वाक्षरी देऊ, अशी भूमिका या निष्ठावंतांनी मांडली आहे. हे निष्ठावंत म्हणतात, आम्हाला पद नको, लाभ नको, ना ठेका नको, आम्ही वर्षानुवर्षे शिवसेनेसोबत आहो आणि राहू. यातील बहुसंख्य शिवसैनिक कधीच नेत्यांच्या बंगल्यावर किंवा शासकीय विश्रामभवनावर दिसत नाहीत. ते नियमित आपल्या कामात असतात. मात्र त्यांची निष्ठा कायम शिवसेनेसोबत आहे. विशेष असे विविध निवडणुकांमध्येसुद्धा त्यांची निष्ठा डगमगत नाही. शिवसेनेत उफाळून आलेल्या या गटबाजीवर हे निष्ठावंत शिवसैनिक तीव्र नाराजी आणि खंतही व्यक्त करीत आहेत. ही गटबाजी अनावश्यक असल्याचे ते सांगतात.काटेकोर मूल्यमापन अपेक्षित शिवसेनेतील या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे काटेकोर मूल्यमापन होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रमुख पदावरील व्यक्तीची उपलब्धी काय, त्याने किती लोकप्रतिनिधी निवडून आणले, त्याच्यामुळे किती कार्यकर्ते पक्ष सोडून गेले व ते दुसऱ्या पक्षातून निवडून आले, नेते, जिल्हा प्रमुखांनी किती ठिकाणी पक्षबांधणीसाठी बैठका घेतल्या, शिवसैनिकांना पक्ष वाढीसाठी किती कार्यक्रम दिले, त्यांच्या किती अडचणी सोडविल्या, विकासासाठी किती निधी आणून दिला, गटबाजीला नेमके खतपाणी कोण घालतेय, या गटबाजीमुळे कुठे नियुक्त्या रखडल्या आहेत काय, युवा सेनेला पक्षात जनतेच्या प्रश्नावर केव्हाही आणि कुठेही आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे काय, निवडणुकांमध्ये नेत्यांच्या सोईची व अन्य पक्षांना फायदा होणारी भूमिका घेतली जाते काय?, वारंवार अपयश येऊनही एकाच व्यक्तीकडे महत्वाचे पद ठेवले जात काय?, लाभाचे पद देताना किती निष्ठावंतांचा विचार झाला, कायम मागे-पुढे फिरणाऱ्या, जी हुजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच लाभ दिला जातो का, शिवसेनेच्या नवीन किती शाखा उघडल्या, जुन्या शाखांचे काय, किती गावात फलक लागले, गाव आणि शाखानिहाय कार्यकर्त्यांची यादी उपलब्ध आहे काय, अशा विविध मुद्यांची निष्ठावंत व सामान्य शिवसैनिकांना उत्तरे हवी आहेत. रामदास कदम यांच्या दौऱ्यावर नजरा शिवसैनिक म्हणून मर्यादा आहे, पक्षांच्या नेत्यांना-पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत सामान्य कार्यकर्ता करू शकत नाही. कुणी तसा प्रयत्न केल्यास त्याला बंडखोर म्हणून पक्षाबाहेर काढले जाण्याची भीती आहे. म्हणूनच या सामान्य शिवसैनिकांच्या नजरा आता जिल्ह्यातील गटबाजीच्या चौकशीसाठी खास ‘मातोश्री’हून पाठविण्यात येणाऱ्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्याकडे लागल्या आहेत. ना. कदम यांनी उपरोक्त तमाम मुद्यांवर नेते-पदाधिकाऱ्यांना जाब विचारावा आणि जिल्हा शिवसेनेतील वास्तव ‘मातोश्री’वर पोहोचवावे, अशी रास्त अपेक्षा या निष्ठावंतांची आहे. लाभ नको, सन्मान हवा खुद्द ‘मातोश्री’ सामान्य शिवसैनिकाला किंमत देते, शिवसेना प्रमुख हे सामान्य शिवसैनिक शिवसेनेचे पाईक असल्याचे मानत होते. मात्र जिल्हा स्तरावरील नेते मंडळी या शिवसैनिकांना तेवढी किंमत, मान-सन्मान देताना दिसत नाहीत. केवळ निवडणुकांच्या वेळीच कुण्या गावात आपला कोण कार्यकर्ता आहे, याची आठवण नेत्यांना होते, अशा शब्दात हे निष्ठावंत आपली खंत व्यक्त करताना दिसत आहेत.