शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांवर समस्यांचा डोंगर, लोकप्रतिनिधींना नाही सवड

By admin | Updated: April 5, 2017 00:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले.

कर्ज परतफेडीचा पेच : शेतमालाला हमी दर मिळणेही दुरापास्त यवतमाळ : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले. यामुळे साध्या तूर खरेदी असो अथवा पीक विम्याची मदत आणि सोयाबिनच्या अनुदानाचा प्रश्न, लोकप्रतिनिधींना सोडविता आला नाही. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या महिन्यापासून शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर पडून आहे. या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींना सवड मिळाली नाही. उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती काबिज करण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे व्यक्त केला होता. त्यानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रावर किमान पाच लाख क्विंटल तूर येण्याची शक्यता होती. या दृष्टीने जिल्ह्यातील १५ केंद्रावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तशा उपाययोजनाच झाल्या नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. यावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या नाही. या केंद्रावरील समस्या अद्याप सुटल्या नाही. अद्याप बारदाना पोहोचला नाही. तत्काळ बारदाना पोहोचवावा, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनने केली. स्मरणपत्र दिले, तरीही बारदाना आला नाही. उशिरा चुकारे मिळणाच्या समस्येचे कुणाला घेणे-देणे नाही. यामुळे विविध अडचणींचा सामना शेतकरी करीत असले तरी लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. (शहर वार्ताहर) केवळ २00 रूपयांचे अनुदानही दूरच सोयाबीनला २०० रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. सातबाऱ्यावर नाव नसले तरी संयुक्त कुटुंबातील सदस्य असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे २७ लाखांचे प्रस्ताव फेटाळले. यावर लोकप्रतिनिधी अवाक्षर बोलायला तयार नाही. पीक विम्याचा आधारही आता झाला धूसर गतवर्षी रबीची अवस्था बिकट होती. यामुळे विमा उतरविणारे सर्वच शेतकरी पात्र होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच हजार शेतकरी पात्र झाले. ३२ हजार शेतकरी अपात्र झाले. ही मदतही मिळत नसल्याने कर्ज परतेडीची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.