शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

शेतकऱ्यांवर समस्यांचा डोंगर, लोकप्रतिनिधींना नाही सवड

By admin | Updated: April 5, 2017 00:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले.

कर्ज परतफेडीचा पेच : शेतमालाला हमी दर मिळणेही दुरापास्त यवतमाळ : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले. यामुळे साध्या तूर खरेदी असो अथवा पीक विम्याची मदत आणि सोयाबिनच्या अनुदानाचा प्रश्न, लोकप्रतिनिधींना सोडविता आला नाही. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या महिन्यापासून शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर पडून आहे. या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींना सवड मिळाली नाही. उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती काबिज करण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे व्यक्त केला होता. त्यानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रावर किमान पाच लाख क्विंटल तूर येण्याची शक्यता होती. या दृष्टीने जिल्ह्यातील १५ केंद्रावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तशा उपाययोजनाच झाल्या नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. यावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या नाही. या केंद्रावरील समस्या अद्याप सुटल्या नाही. अद्याप बारदाना पोहोचला नाही. तत्काळ बारदाना पोहोचवावा, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनने केली. स्मरणपत्र दिले, तरीही बारदाना आला नाही. उशिरा चुकारे मिळणाच्या समस्येचे कुणाला घेणे-देणे नाही. यामुळे विविध अडचणींचा सामना शेतकरी करीत असले तरी लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. (शहर वार्ताहर) केवळ २00 रूपयांचे अनुदानही दूरच सोयाबीनला २०० रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. सातबाऱ्यावर नाव नसले तरी संयुक्त कुटुंबातील सदस्य असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे २७ लाखांचे प्रस्ताव फेटाळले. यावर लोकप्रतिनिधी अवाक्षर बोलायला तयार नाही. पीक विम्याचा आधारही आता झाला धूसर गतवर्षी रबीची अवस्था बिकट होती. यामुळे विमा उतरविणारे सर्वच शेतकरी पात्र होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच हजार शेतकरी पात्र झाले. ३२ हजार शेतकरी अपात्र झाले. ही मदतही मिळत नसल्याने कर्ज परतेडीची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.