शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जुना हिशेब नाही, पुन्हा नवे प्रस्ताव

By admin | Updated: December 13, 2015 02:29 IST

जिल्हा नियोजन समितीतून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आजपर्यंत जुनी मंजूर कामे पेंडिंग ठेवून नवीन कामांसाठी प्रस्ताव पाठविण्याचा पायंडा पडला आहे.

डीपीसीचा निधी : २५३ कोटींचे बजेट, खर्च केवळ ३५ कोटी यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीतून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आजपर्यंत जुनी मंजूर कामे पेंडिंग ठेवून नवीन कामांसाठी प्रस्ताव पाठविण्याचा पायंडा पडला आहे. आता यात बदल करण्यात आला. जुनी कामे पूर्ण होणार नाही तोपर्यंत नव्यांचा विचारही केला जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शिवाय झालेल्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणेला द्यावे लागणार आहे. त्यामुळेच डीपीसीचा निधी अडविण्यात आल्याची ओरड होत आहे. जिल्हा नियोजन समितीतून डिसेंबरपर्यंत ६१ कोटी ४५ लाखांचे वितरण करण्यात आले. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी २५३ कोटी ११ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वितरीत केलेल्या एकूण निधीपैकी केवळ ३५ कोटी २१ लाख रुपयेच खर्च झाले आहे. निधी अखर्चित ठेवण्यासाठी निर्ढावलेल्या यंत्रणांकडून पुन्हा नवीन प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षातीलच अनेक कामे या यंत्रणांकडून पूर्ण करण्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घ्यायचा आणि तो वेळेत खर्चच करायचा नाही अशी प्रथा येथे सुरू होती. कामांचा प्राधान्यक्रम न पाहता सोयीचे ठरेल अशा ठिकाणी कामे केली जात होती. हा प्रकार थांबविण्यासाठी प्रशासनाकडून थेट उपयोगीता प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. त्यामुळे आता प्रस्ताव सादर करतानाही यंत्रणेतील प्रमुखांना चारदा विचार करावा लागणार आहे. नियोजन समितीतून रस्ते निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ३०/५४ आणि ५०/५४ या शिर्षावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. जनसुविधा, नावीन्यपूर्ण कामे यावरही निधी देण्यात येतो. मात्र या निधीचा विनियोग करणाऱ्या बहुतांश यंत्रणेने मागील आर्थिक वर्षाचाच निधी खर्च केला नाही. एकाच कामाला दोन ते तीन वेळा प्रशासकीय मान्यताही घेतल्याचेही दाखले आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम यासाठी निधी मंजूर करूनही कित्येक वर्षांपासून त्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेच नाही. १० इमारतीसाठी निधी दिला असला तरी प्रत्यक्षात दोन ते तीन इमारती पूर्ण झाल्याचे दाखवून इतर इमारती प्रक्रियेत असल्याचा अहवाल दिला जातो. याच आधारावर चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावांना मंजुरी घेण्याचा खटाटोपही केला जातो. यामुळे पेंडिंग कामांची संख्या वाढत आहे. एकीकडे निधी खर्च न होता गुंतून पडतो. याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या विकासावर झाल्याचे दिसून येते. यामुळेच ज्यांनी वेळेत निधी खर्च केला नाही त्यांच्या नवीन प्रस्तावालाही अजूनपर्यंत मान्यता देण्यात आली नाही. महत्त्वपूर्ण असलेल्या कृषीच्या योजना, ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजना, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांना चालू आर्थिक वर्षातूनही तातडीने निधी देण्यात आला आहे. वन विभागाकडून पाच वर्षांच्या कामाचे नियोजन केले जाते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील कामांचे मूल्यमापन करून त्यांना निधी देण्यात येतो. यावर्षी २ कोटी २७ लाख रुपये देण्यात आले आहे. जलयुक्त शिवारसाठी ५३ कोटी ५१ लाख असून आतापर्यंत १३ कोटी ९० लाख देण्यात आले आहे. डीपीसीनी निधी वितरीत केला. आता या वर्षातील निधी खर्चाचा आढावा घेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)