शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच राहिला नाही, मास्क कशाला वापरायचा? कारवाईची भीतीही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लाॅकडाऊन खुले करण्यात आले. लाॅकडाऊन खुले झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार पूर्ववत होत आहे. याच सुमारास तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापरच सोडून दिला आहे. ‘लोकमत’ने शहरातील बहुतांश भागांचे सर्वेक्षण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

कोरोनाची लाट ओसरली, अन् कारवाईही संपलीकोरोनाची पहिली लाट आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला घाबरून मास्क वापरणे सुरू केले होते. यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आता कोरोनाची लाट ओसरली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नगर परिषद, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी कारवाई करणे टाळले आहे. विनाकारणच रोष नको म्हणून कारवाई थंड बस्त्यात आहे.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात

आज बाजाराचा दिवस होता. खेड्यापासून शहरातील मंडळीही भाजी खरेदीसाठी आली होती. मात्र, या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतक्याच व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता.

 दत्त चाैक 

शहरातील सर्वाधिक गजबजलेला चाैक म्हणून दत्त चाैक ओळखला जातो. याठिकाणी प्रत्येकजण येतो. मात्र, विक्रेत्यांपासून खरेदीदारापर्यंत अनेकांच्या तोंडावर मास्क दिसतच नाही.

 आर्णी नाका 

नव्याने गजबजलेली बाजारपेठ या मार्गावर पाहायला मिळते. मोठमोठी दुकाने आणि हाॅटेल्स याच मार्गावर आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी बहुतांश नागरिक विनामास्क वावरताना पाहायला मिळतात.

मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?

प्रशासनाकडून मास्क नसणाऱ्या नागरिकांवर कारवाईच होत नाही. मग, आपण मास्क वापरायचे कशाला? या कारणाने अनेकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. यातून धोका वाढला आहे.- जीवन बोरकर

आपण लस घेतली, अनेकांनी लस घेतली. आता कोरोनाची काळजीच नाही. नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. शहर आणि खेड्यात सारखी स्थिती आहे.- अंगद पोपटकर

मास्क वापरला तर पार्लरची केलेली तयारी दिसत नाही. याशिवाय चांगले कपडे परिधान केल्यावर मॅचिंग मास्कही नसतो. यामुळे बहुतांश मुली, महिला मास्क वापरणे टाळत आहे.- प्रियंका बिडकर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या