शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

१० दिवसांपासून नळच नाही

By admin | Updated: March 17, 2016 03:03 IST

येथील जुना उमरसरा परिसरातील यशोधरानगरात गत दहा दिवसांपासून जीवन प्राधिकरणाकडून नळच सोडण्यात आले नाही.

प्राधिकरणाचे दुर्लक्ष : यशोधरानगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारायवतमाळ : येथील जुना उमरसरा परिसरातील यशोधरानगरात गत दहा दिवसांपासून जीवन प्राधिकरणाकडून नळच सोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.२० ते २५ घरांची वस्ती असलेल्या या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियमितपणे एक दिवस आड संध्याकाळी सहाच्या सुमारास नळ येतात. गेल्या वर्षभरापासून रात्री बारानंतर कधीतरी नळ सोडण्यात येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वर्षभरही रात्र जागून काढावी लागते. याबाबत वारंवार प्राधिकरणाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु गांभिर्याने दखलच घेतल्या जात नाही. आता तर दहा दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही. उल्लेखनिय म्हणजे या ठिकाणी प्राधिकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. बोअरवेलला पाणी लागत नाही त्यामुळे बोअरवेल करून फायदा नाही. याच कारणामुळे हातपंपही नाही. उमरसरा ग्रामपंचायतची यशोधरानगराला लागून असलेल्या निखिलनगरात स्वतंत्र नळ योजना आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतकडे या बाबत साकडे घातले होते. ग्रामपंचायतसुद्धा लोकवर्गणीतून नळ योजना या भागात टाकून देण्यास तयार झाली होती. परंतु ग्रामपंचायत नगर परिषदेत गेली आणि सर्वकाही खोळंबल. प्राधिकरणाकडून पाणी देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसताना देयके मात्र नियमित पाठविली जातात, पाणीच मिळत नसलेल्या नळाचे बिलही नागरिक भरतात. या तीव्र अशा पाणीटंचाईबाबत प्राधिकरणाचे उपअभियंता शेषराव दारव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता उंचावर असल्यामुळे पाणी या भागात चढत नसल्याचे ते म्हणाले, वास्तविक एक वर्षापूर्वी या ठिकाणी प्राधिकरणाच्या नळाला भरमसाठ पाणी होते. नळ जोडण्या वाढल्यामुळे पाणी मिळत नसल्याचेही दारव्हेकर सांगतात. वर्षभरात या भागात केवळ दोन ते तीन नळजोडण्या वाढल्या असतील. त्यामुळे प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या स्पष्टीकरणाबाबत नागरिकांमध्ये चिड निर्माण होणे सहाजिक आहे. परिस्थिती अशीच कायम राहल्यास पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)