शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

१० दिवसांपासून नळच नाही

By admin | Updated: March 17, 2016 03:03 IST

येथील जुना उमरसरा परिसरातील यशोधरानगरात गत दहा दिवसांपासून जीवन प्राधिकरणाकडून नळच सोडण्यात आले नाही.

प्राधिकरणाचे दुर्लक्ष : यशोधरानगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारायवतमाळ : येथील जुना उमरसरा परिसरातील यशोधरानगरात गत दहा दिवसांपासून जीवन प्राधिकरणाकडून नळच सोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.२० ते २५ घरांची वस्ती असलेल्या या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियमितपणे एक दिवस आड संध्याकाळी सहाच्या सुमारास नळ येतात. गेल्या वर्षभरापासून रात्री बारानंतर कधीतरी नळ सोडण्यात येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वर्षभरही रात्र जागून काढावी लागते. याबाबत वारंवार प्राधिकरणाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु गांभिर्याने दखलच घेतल्या जात नाही. आता तर दहा दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही. उल्लेखनिय म्हणजे या ठिकाणी प्राधिकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. बोअरवेलला पाणी लागत नाही त्यामुळे बोअरवेल करून फायदा नाही. याच कारणामुळे हातपंपही नाही. उमरसरा ग्रामपंचायतची यशोधरानगराला लागून असलेल्या निखिलनगरात स्वतंत्र नळ योजना आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतकडे या बाबत साकडे घातले होते. ग्रामपंचायतसुद्धा लोकवर्गणीतून नळ योजना या भागात टाकून देण्यास तयार झाली होती. परंतु ग्रामपंचायत नगर परिषदेत गेली आणि सर्वकाही खोळंबल. प्राधिकरणाकडून पाणी देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसताना देयके मात्र नियमित पाठविली जातात, पाणीच मिळत नसलेल्या नळाचे बिलही नागरिक भरतात. या तीव्र अशा पाणीटंचाईबाबत प्राधिकरणाचे उपअभियंता शेषराव दारव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता उंचावर असल्यामुळे पाणी या भागात चढत नसल्याचे ते म्हणाले, वास्तविक एक वर्षापूर्वी या ठिकाणी प्राधिकरणाच्या नळाला भरमसाठ पाणी होते. नळ जोडण्या वाढल्यामुळे पाणी मिळत नसल्याचेही दारव्हेकर सांगतात. वर्षभरात या भागात केवळ दोन ते तीन नळजोडण्या वाढल्या असतील. त्यामुळे प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या स्पष्टीकरणाबाबत नागरिकांमध्ये चिड निर्माण होणे सहाजिक आहे. परिस्थिती अशीच कायम राहल्यास पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)