शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘निर्मल भारत’ योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 00:41 IST

ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे

नांदेपेरा : ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना आजारांची लागण होऊ नये आणि गावात घाणीचे साम्राज्य पसरू नये, याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक योजना राबविल्या जातात़ त्यापैकीच निर्मल भारत अभियान ही योजना गावागावांत राबविली जात आहे़ तथापि सदर योजना ग्रामीण भागात योग्यपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे़ गावात अनेकांकडे शौचालय नसते. त्यामुळे ग्रामस्थ, महिला अगदी गावालगत सायंकाळी व पहाटे रस्त्यालगतच शौचाला जातात. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ महिलांना तर शौचालयाकरिता कसरतच करावी लागते़ घरी शौचालये नसल्यामुळे त्यांना अंधाराची वाट बघात ताटकळत राहावे लागते. ही बाब सर्वांसाठीच लांच्छनास्पद आहे. तरीही त्याकडे अनेक कुटूंब प्रमुख दुर्लक्ष करतात. घरी शौचालय बांधकाम करण्याकरिता शासनातर्फे अनुदान दिले जाते़ मात्र त्या अनुदानातून अनेक ठिकाणी शौचालय पूर्ण होत नाही़ याबाबत नेहमी ग्रामस्थ ओरड करतात. मात्र पदरचे काही पैसे टाकून शौचालय पूर्ण होणे शक्य असते. याचा त्यांना विसर पडतो. ज्या गावात काही ग्रामस्थांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला, त्या घरकुल योजनेत शौचालय बंधनकारक करण्यात आले आहे. शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाची पूर्ण रक्कम मिळत नसते़ परंतु त्यावरही ग्रामस्थांनी मानी नक्कल लढवून केवळ शौचालयाची शिट बसवून दिखावा तयार करीत अनुदान लाटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी त्यानुसारच घरकुलाची पूर्ण रक्कम पदरात पाडूनही ोतली आहे. काही ग्रामस्थांनी तर शौचालये बांधलीच नाही़ काही गावांतील ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले, परंतु शौचालयाचा उपयोगच केला नाही़ त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)