शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने यवतमाळात निर्जळी

By admin | Updated: November 15, 2014 22:53 IST

भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

‘रिलायन्स’चा प्रताप : तहसीलसह पोलीस मुख्यालय जलमय यवतमाळ : भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. या पाण्यामुळे तहसील आणि पोलीस मुख्यालयाचा परिसर जलमय झाला होता. तर अर्ध्या यवतमाळ शहरातील एक लाख नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. दरम्यान खोदकामाविरोधात जीवन प्राधिकरणाने सदर कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यवतमाळ शहरात रिलायन्स जीओ इन्फो कॉम लिमिटेड कंपनीच्यावतीने आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) टाकण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीला मनुष्यबळाच्या सहाय्याने खोदकाम करण्याच्या सूचना होत्या. मात्र कंपनीने अद्यवत मशनरीच्या साहाय्याने शहरात खोदकाम सुरू केले. शुक्रवारी मध्यरात्री तहसील चौकात खोदकाम सुरू असताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. याची कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यासाठी ही वाहिनी सुरू केली. मात्र तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. हा प्रकार लक्षात आला तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. जलवाहिनीतील धो-धो वाहणारे पाणी लगतच्या तहसील कार्यालय परिसरात शिरले. संपूर्ण परिसर जलमय झाला होता. तहसील कार्यालयातील कोरडी विहिरही या पाण्याने ओव्हरफ्लो झाली होती. पोलीस मुख्यालय परिसरातही पाणी शिरले. तसेच नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीपर्यंत पाण्याचे लोट पोहोचले होते. तर दुसरीकडे टांंगा चौकापर्यंत पाण्याचा धो-धो प्रवाह वाहत असल्याने अनेक दुकानात पाणी शिरले. पहाटे झालेल्या या प्रकाराने सारेच जण चकीत झाले. त्यानंतर जीवन प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यवतमाळ शहरात आधीच एक दिवस आड पाणीपुरवठा होतो. पाणी पाळीनुसार मुख्य बाजारपेठ, पोलीस वसाहत, पांढरकवडा रोड, भोसा मार्ग आणि धामणगाव मार्गाला शनिवारी पाणी मिळणार होते. मात्र मुख्य जलवाहिनीच फुटल्याने या भागात पाणीच पोहोचले नाही. तब्बल एक लाख लोकांना पाणीच मिळाले नाही. काही भागात दुपारच्या वेळात गढूळ पाणी येत होते. तब्बल एक लाख नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. सायंकाळी जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात ध्वनिक्षेपकावरून सूचना देऊन दुरुस्ती काम होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही, असे सांगितले. (शहर वार्ताहर)