शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक

पावसाचा नीचांक : यंदा कोरड्या दुष्काळाची छाया रूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक यंदा नोंदविला गेला. आतापर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसाने सव्वालाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले असून तीन लाख मेट्रिक टन चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झाली नाही. संपूर्ण जिल्हाच कोरड्या दुष्काळाच्या सावटात आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध यवतमाळ जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा कायमच आहे. गेल्या १४ वर्षांपासून पाच वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांपुढे आवासून उभे असते. २००२ ते २०१४ या कालावधीत नऊ वेळा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांना अनुभवावा लागला. २००२, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०१२, २०१३ आणि आता २०१४ मध्येही संकटाची मालिका कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. केंद्र सरकारने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा दुष्काळाच्या यादीत दिसत असून १५ आॅगस्टनंतर हा अहवाल जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या सुपूर्द करणार आहे. सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली. आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये दोन लाख ३५ हजार हेक्टर सोयाबीन, चार लाख ६० हजार हेक्टर कपाशी, एक लाख हेक्टर तूर व इतर पिकांचा पेरा झाला आहे. उशिरा आलेल्या पावसाने दोन लाख हेक्टरवरचे बियाणेच उगवले नाही. मात्र सव्वालाख हेक्टरवर पुन्हा पेरणी करावीच लागली. दुबार पेरणीच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकरी देत आहे. १५ आॅगस्टपर्यंत या तक्रारी गोळा केल्या जातील. त्यानंतर दुष्काळी अहवाल सादर केला जाईल.