शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

१४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक

पावसाचा नीचांक : यंदा कोरड्या दुष्काळाची छाया रूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक यंदा नोंदविला गेला. आतापर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसाने सव्वालाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले असून तीन लाख मेट्रिक टन चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झाली नाही. संपूर्ण जिल्हाच कोरड्या दुष्काळाच्या सावटात आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध यवतमाळ जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा कायमच आहे. गेल्या १४ वर्षांपासून पाच वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांपुढे आवासून उभे असते. २००२ ते २०१४ या कालावधीत नऊ वेळा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांना अनुभवावा लागला. २००२, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०१२, २०१३ आणि आता २०१४ मध्येही संकटाची मालिका कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. केंद्र सरकारने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा दुष्काळाच्या यादीत दिसत असून १५ आॅगस्टनंतर हा अहवाल जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या सुपूर्द करणार आहे. सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली. आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये दोन लाख ३५ हजार हेक्टर सोयाबीन, चार लाख ६० हजार हेक्टर कपाशी, एक लाख हेक्टर तूर व इतर पिकांचा पेरा झाला आहे. उशिरा आलेल्या पावसाने दोन लाख हेक्टरवरचे बियाणेच उगवले नाही. मात्र सव्वालाख हेक्टरवर पुन्हा पेरणी करावीच लागली. दुबार पेरणीच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकरी देत आहे. १५ आॅगस्टपर्यंत या तक्रारी गोळा केल्या जातील. त्यानंतर दुष्काळी अहवाल सादर केला जाईल.