शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

नऊ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गुंता वाढणार

By admin | Updated: June 10, 2015 02:32 IST

दहावी परीक्षेच्या निकालाच्या आनंदासोबतच जिल्ह्यातील पालकांना प्रवेशाची चिंताही लागली आहे.

यवतमाळ : दहावी परीक्षेच्या निकालाच्या आनंदासोबतच जिल्ह्यातील पालकांना प्रवेशाची चिंताही लागली आहे. ३५ हजार ८२१ विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले असून जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता केवळ २६ हजार ६३३ आहे. त्यामुळे नऊ हजार १८८ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे असल्याने विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियेत मोठी कसोटी लागणार आहे.दहावीचा निकाल सोमवारी घोषित झाला.सर्व विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश हवा आहे. जिल्ह्यात २८६ कनिष्ठ महाविद्यालय आहे तर १४ स्वयंअर्थतत्वावरील महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश क्षमता २६ हजार ६३३ आहे. जिल्ह्यात नियमित तब्बल ३३ हजार ७२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यासोबतच दोन हजार ९६ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. ३५ हजार ८२१ विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश हवा आहे. दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. १२ हजार १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. तर विशेष प्राविण्यासह पाच हजार ६३० विद्यार्थी पास झाले. या बहुतांश विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतच प्रवेश हवा आहे. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होणार आहे. काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, कृषी आणि आयटीआयकडेही जाणार आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यंदा पास होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा गुंता वाढणार आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश दिला जाईल. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी मागणी केल्यास त्यांना तुकडीत वाढ करून दिली जाईल, असे सहायक शिक्षण उपनिरीक्षक चंद्रप्रकाश वाहने यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)