शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

निम्न पैनगंगा भूसंपादनात नऊ कोटींची अफरातफर

By admin | Updated: January 18, 2017 00:02 IST

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून

तलाठी मुख्य आरोपी : ४६ शेतकऱ्यांचा सातबारा बदलविला आर्णी : निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी खडका येथील सेवानिवृत्त तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलाठ्याने ४६ शेतकऱ्यांच्या सातबारा बदलविल्याचा आरोप आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी भूसंपादन करताना तत्कालीन तलाठी विनोद हरिभाऊ ठाकरे (६०) यांनी शेतकऱ्यांच्या मूळ सातबारा ऐवजी बनावट सातबारा दिले. त्यामध्ये सातबाराचा आकार बदलविणे, सिंचन क्षेत्र नसताना सिंचन दाखविणे आदी बाबी केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या प्रकरणी यवतमाळ येथील प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळचे उपविभागीय अधिकारी यांची चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील २०० हेक्टर जमिनीचा खरेदी मोबदला शेतकऱ्यांना आठ कोटी ७७ लाख ४१ हजार ३८४ रुपये नियमबाह्य प्रदान करण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले. २००९-१० या कालावधीत धरण रेषा व बुडित क्षेत्रातील खडका येथील ४६ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने खरेदी केल्या आहे. यात २०१२ मध्ये खरेदी संबंधित तक्रार प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये सरळ खरेदी वेळी शेतकऱ्यांनी सादर केलेले महसूल खात्याचे सातबारा व मूळ सातबारा यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले. यावरून यामध्ये अफरातफर झाल्याचे पुढे आले. अखेर आर्णी येथील तहसीलदार सुधीर पवार यांनी सोमवारी घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तत्कालीन तलाठी विनोद ठाकरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी) आरोपी केवळ तलाठी कसा ? कुठल्याही प्रकल्पासाठी भूसंपादन करताना महसुलातील संपूर्ण यंत्रणा या कामाला लागते. जागेचे अवार्ड काढताना भूसंपादन अधिकारी, संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि शेवटी तलाठी अशी यंत्रणा काम करते. शिवाय जमीन संपादन करताना भूमिअभिलेख विभागाचा अहवालही महत्वाचा मानला जातो. मात्र आर्णी तालुक्यातील भूसंपादन प्रकरणातील अफरातफरीत केवळ तलाठ्यावरच आरोप निश्चित करण्यात आले. नऊ कोटी रुपयांच्या प्रकरणात केवळ तलाठीच आरोपी कसा असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणात अनेक मोठे मासेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.