शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे. 

ठळक मुद्देपाच जणांना एकत्र येण्यावर बंदी : कारवाईसाठी पोलीस व पालिकांची संयुक्त पथके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी हा आदेश जारी केला आहे. संचारबंदी व अन्य निर्बंधांचे पालन होते की नाही, यावर वाॅच ठेवण्यासाठी नगरपालिका, तसेच ग्रामपंचायत व पोलिसांची संयुक्त पथकेही गठित करण्यात आली आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे हा गुन्हा आहे. थुंकल्यास दंड भरावा लागणार आहे, तसेच सार्वजिनक पान, दारू, तंबाखू आदींच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभाकरिता ५० जणांच्या, तर अंत्यविधीकरिता २० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल. खासगी आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील, तर निर्मिती उद्योग हे पूर्ण क्षमतेसह मात्र सोशल डिस्टन्स पाळून सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत, तर ठोक भाजीमंडई पहाटे ३ ते सकाळी ६ या काळात सुरू राहील. मात्र, तेथे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. सभागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालये यांनी उपस्थितीसंदर्भात नियमाचे पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती असेपर्यंत नियम मोडणारी मंगल कार्यालये बंद ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.  

रुग्णांच्या हातावर मारणार शिक्केहोम आयसोलेशनमधील रुग्णांवर आता कठोर नजर ठेवली जाणार आहे. त्याच्या घरासमोर तो पाॅझिटिव्ह असल्याचा ठळक फलक लावला जाणार आहे. त्यात त्याच्या गृहविलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधीही नमूद असेल. तसेच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

शासकीय कार्यालयात बाहेरच्यांना ‘नो एन्ट्री’शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी फक्त लोकप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर या काळात अन्य अभ्यागतांना प्रवेश नसेल. अत्यावश्यक काम असेल तरच विभाग प्रमुखांची पास घेऊनच बैठकीसाठी जावे लागणार आहे. 

हाॅटेलला पार्सलची मुभासिनेमागृह, हाॅटेल्स, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवली जाणार आहे. मात्र हाॅटेल्सला रात्री ११ पर्यंत पार्सल सुविधा पुरविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.  

या चुका कराल तर रोख पडेल दंड संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती १ हजार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार मास्क न घातल्यास ५०० सार्वजनिक वाहतूक करताना निर्बंध न पाळल्यास ५००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या