शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेची नव्याने प्रक्रिया

By admin | Updated: July 18, 2016 01:06 IST

अरूणावती प्रकल्पातून प्रस्तावित असलेली ४२ कोटी ८० लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना वांद्यात सापडली आहे..

आर्णी नगराध्यक्षांची माहिती : ‘ग्राफिक’ कंपनीची याचिका खारीज आर्णी : अरूणावती प्रकल्पातून प्रस्तावित असलेली ४२ कोटी ८० लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना वांद्यात सापडली आहे. न्यायालयाने तांत्रिक सल्लागार कंपनीची याचिका खारीज केल्याने आता नव्याने निविदा प्रक्रिया होणार असून यामुळे सत्य बाहेर आल्याची माहिती नगराध्यक्ष आरीज बेग यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्णी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ४२ कोटी ८० लाख रूपयांची योजना मंजूर झाली आहे. ही योजना जिल्हाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात राबविण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकाऱ्ऱ्यांनी प्रक्रिया सुरू केली. मात्र नगरपरिषदेने नियमांना बगल देत प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप नगराध्यक्ष आरिज बेग यांनी घेतला होता. तरीही मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप बेग यांनी केला. प्रथम तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यात चार कंपन्यांनी निविदा भरल्या. पाचव्या कंपनीला बाद ठरविण्यात आले. विशेष म्हणजे निविदा भरलेल्या चारपैकी तीन कंपन्या पात्रच नव्हता, असा दावा बेग यांनी केला. तरीही ठरल्यानुसार ‘ग्राफीक’ कंपनीला तांत्रिक सल्लागार म्हणून नेमण्यात आले होते. ही प्रक्रिया चुकीची असल्याचे नगध्यक्षांचे म्हणणे होते. तथापि ‘ग्राफिक’ कंपनीला कार्यादेश देण्याचा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. त्यामुळे नगरपरिषदेने एका सभेत सदर कंपनीला कामाची मंजुरी दिली होती. दरम्यान, पाचव्या कंपनीने संबंधित अधिकारी व राज्य शासनाकडे तक्रार केली होती. यामुळे घाबरलेल्या ‘ग्राफीक’ कंपनीने न्यायालयात आपल्याला मिळालेले काम रद्द करू नये म्हणून याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने खारीज केल्याची माहिती बेग यांनी दिली. याच दरम्यान मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनीही नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरुन डॉ.पाटील यांनी योजनेला काही काळ स्थगिती दिली होती. नंतर आमदार राजू तोडसाम यांनीसुद्धा निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली होती. आमदार तोडसाम यांनी चौकशीची मागणी केल्याने राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (अमरावती) मुख्य अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिले. मुख्य अभियंत्यांनी याबाबत चौकशी करून अहवाल शासनाकडे सोपविला. तत्पूर्वी न्यायालयाने या योजनेसंदर्भात राज्य शासनाने कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये, असे बजावले होते. त्यामुळे राज्य शासनाने चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालानंतर न्यायालयाने ‘ग्राफीक‘ कंपनीची याचिका खारीज केली असून आता नव्याने तांत्रिक सल्लागार समितीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष आरीज बेग यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष नीता ठाकरे, खुशाल ठाकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)