शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सामूहिक श्रमदानातून रचला नवा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:18 IST

वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : दारव्ह्यात तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे काम

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.बारा गावात विविध संघटना आणि गावातील नागरिक यांनी अडीच तासात दीड हजार घनमीटर काम केले. आता पावसाळ्यात या ठिकाणी किमान वीस दिवस जरी पाऊस पडला तरी तीन कोटी लीटर पाणी साठवून राहील. त्यामुळे याचा गावकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. पाणी फाऊंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संबंध महाराष्ट्रात होत असली तरी दारव्हा तालुक्यात मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व तहसीलदार अरूण शेलार यांनी ज्या पद्धतीने लोकांना प्रोत्साहित करून कामाला लावले त्याला तोड नाही. स्पर्धेतील मुल्यांकनापूर्वीच हजारोंच्या संख्येनी शोषखड्डे, माती परीक्षण, रोप वाटिका, तयार करण्यात आल्या. रात्री १२ च्या ठोक्याला श्रमदानाने या स्पर्धेची सुरूवात झाली. या उपक्रमांतर्गत शहरातील बारा विविध संघटनांची निवड करण्यात येऊन गावकऱ्यांच्या साथीने त्यांच्या श्रमदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पत्रकार संघटनेने लाख येथे सलग समतल चर खोदणे व दगडी बांधकामाकरीता सहकार्य केले. सलगचर तयार करण्यासाठी मॉर्निंग वॉक ग्रुपने हातोला, चैतन्य ग्रुप आॅफ स्पोर्टस्ने लोही, वकील संघटनेने भुलाई, मेडकील ग्रुपने खोपडी, डॉक्टर असोसिएशनने तपोना, महिला ग्रुपने कोलवाई, कृषि साहित्य विक्रेता संघाने माळेगाव येथे उपक्रमात सहभाग घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, आरडीसी नरेंद्र फुलझेले, एसडीओ जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन श्रमदान केले.अबालवृद्धांचा सहभागअधिकारी, कर्मचारी, विविध संघटनामुळे, गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. श्रमदानात नवयुवकच नव्हे तर वृद्ध, लहान मुले, महिला आदींनी आपला सहभाग नोंदविला सर्वांनी झेपेल ते काम केले. उभेही राहू शकत नाही अशा वृद्धांनी दगड जमा करून दिले.